AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली.

पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी
भारतीय सैन्याकडून या अफगाणी दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 23, 2021 | 4:07 PM
Share

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात सत्तेवर तालिबान आल्यानंतर आता भारतात अफगाणी दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आली आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी याबाबत सरकारला अलर्ट जारी केला आहे. या संस्थांच्या माहितीनुसार, भारतात कुठल्यातरी मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. त्यातच मिलिट्री कॅम्प, मोठी सरकारी कार्यालयं यांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून भारताची सीमा पार करुन दिली जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली. त्यानंतर ही गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. ( Pakistan infiltrates Afghan terrorists across . Chance of a major attack. High alert issued by intelligence agencies )

दहशतवाद्यांसोबत झालेल्या या झडपेत एक भारतीय सैनिकही जखमी झाला आहे. माहितीनुसार, या अफगाणी दहशतवाद्यांकडे घातक शस्र आहेत. हेच नाही तर जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांकडून यांना मदत मिळत आहे. उरी सेक्टरच्या अंनगूर पोस्टजवळील सीमेच्या तारा कापून या अफगाणी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत प्रवेश देण्यात आला आहे.

दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु

भारतीय सैन्याकडून या अफगाणी दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सीमेजवळ दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं कळल्यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून उरी सेक्टरमध्ये हा तपास सुरु आहे. असं असलं तरी या भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सुरु आहेत. मात्र सीमेजवळच्या भागातील दूरसंचार व्यवस्था सध्या ठप्प करण्यात आली आहे.

चकमकीत भारतीय जवान जखमी

एका सुरक्षा प्रवक्त्यांनी हे मान्य केलं की, शोध मोहिम सुरु आहे, मात्र याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरच्या तारांजवळ पहिल्यांदा या दहशतवाद्यांशी सामना झाला, त्यात सैन्याचा एक जवान जखमी झाला, त्यानंतर हे दहशतवादी पळाले. याच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी उरी सेक्टरमध्ये सैनिक दिवसाची रात्र करत आहेत. उरीतून बाहेर पडणारे सगळ्या रस्त्यांवर चेकिंग सुरु आहे, जेणेकरुन हे दहशतवादी बाहेर पडू नयेत. ज्या भागात ही चकमक झाली आहे, तो भाग गोहलान जवळ आहे, हा तोच भाग आहे जिथं सप्टेंबर 2016 मध्ये उरी ब्रिगेडवर दहशतवादी हल्ला झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व अफगाणी दहशतवादी आहेत आणि सहजरित्या भारतीयांमध्ये मिसळू शकतात. त्यामुळे सैन्याकडून अधिक काळजी घेतली जात आहे. शंका असलेल्या ठिकाणांवर सैनिकी छापे पडत आहेत, आणि संशयावरुन अनेक लोकांची चौकशीही सुरु आहे.

हेही वाचा:

पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक

New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी

 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली