AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: मध्यरात्री आमच्यावर हल्ला आणि…, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी मीडियाची प्रतिक्रिया

Operation Sindoor: पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाला की, भारताने मध्यरात्री कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले.

Operation Sindoor: मध्यरात्री आमच्यावर हल्ला आणि..., ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी मीडियाची प्रतिक्रिया
ऑपरेश सिंदूर
| Updated on: May 07, 2025 | 8:49 AM
Share

Operation Sindoor: पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. याचदरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर एयरस्ट्राइक केलं. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मीडिया यावर प्रतिक्रिया देत आहे.

पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाला की, भारताने मध्यरात्री कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले.

डीजी चौधरी मध्यरात्री 1.06 वाजता ARY News ला म्हणाला, ‘भ्याड शत्रू भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी हवाई हल्ले केले – सुभानल्लाह मशीद, कोटली कोटली आणि मुझफ्फराबाद याठिकाणी हल्ले केले आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्कान देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी याचं उत्तर देईल. घृणास्पद चिथावणीला लवकरच उत्तर देण्यात येईल…’

पाकिस्तानी वृत्तसंस्था जिओ न्यूजने ऑपरेशन सिंदूरला भारताची आक्रमक आणि चिथावणीखोर कारवाई म्हणून सांगितलं आहे. ‘भारताने तीन ठिकाणी मिसाईल हल्ले केले आहे आणि पाकिस्तान याचं उत्तर देईल…’

पाकिस्तानच्या सरकारी प्रसारक पीटीव्ही न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने केलेल्या हल्ल्यात एका निर्दोष मुलगा शहीद झाला असून एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी आहे. भारताने मध्यरात्री निर्दोष पाकिस्तानी नागरिकांवर भ्याड हल्ला केला.

सुरक्षा मंत्री ख्वाजा आसिफ याने ARY News सांगितलं, निवासी भागांवर हल्ले झाले आहेत. भारताने त्यांच्या हवाई हद्दीतून हल्ला केला आहे. त्यांनी त्यांच्या सीमेवरून हल्ला केला. त्यांना बाहेर येऊ द्या, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.

काही वाहिन्यांनी भारताचे हल्ले मर्यादित असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तान याचं योग्य वेळी प्रत्युत्तर देईल असं देखील म्हटलं आहे. सांगायचं झालं तर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 17 जण गंभीर जखमी झाली.

हल्ला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात करण्यात आला, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी निवडकपणे लोकांना लक्ष्य केले. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांनी धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला.

Follow Us
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं