AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला, PM मोदींचा हल्लाबोल

PM Modi : भाजपप्रणित एनडीए आघाडीने बिहारमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला, PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi
| Updated on: Nov 15, 2025 | 9:03 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या गुजराज दौऱ्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना मोदींनी म्हटले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जाणून जातीवर आधारित भाषणे देत होते. याद्वारे ते जातीवादाचे विष पसरवत असत. त्यांना वाटत होते की यामुळे त्यांना यश मिळेल, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उज्ज्वल संदेश आहे.

पंतप्रधान मोदांनी पुढे बोलताना वक्फ कायद्यावर बोलताना म्हटले की, ‘बिहारमध्ये जमीन आणि घरांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आणि नंतर वक्फ मालमत्तेत रूपांतरित केली गेली. तामिळनाडूमध्येही हजारो वर्षे जुन्या गावांना वक्फ मालमत्ता घोषित करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आम्ही वक्फबाबत कायदा मंजूर केला, त्यामुळे आता गैरप्रकार थांबणार आहे.’

बिहारच्या जनतेने जातीयवाद नाकारला

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बिहार निवडणुकीदरम्यान अनेक तेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वक्फ कायदा फाडत आम्ही जिंकल्यावर वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र बिहारच्या लोकांनी या जातीय विषाला पूर्णपणे नाकारले आहे. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वरिष्ठ नेते नितीश कुमार यांचा अपमान करत आहेत. ते अपमानास्पद भाषा वापरत आहेत. मात्र बिहारच्या जनतेने हे स्वीकारले नाही.

दलित समाजाचा एनडीएला पाठिंबा

PM मोदी पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांबाबतच्या द्वेशाचे वातावरण या निवडणुकीत दिसून आले. सर्व मतदारांनी एनडीए आणि त्यांच्या मित्रपक्षांना अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे. दलित समुदायाचे वर्चस्व असलेल्या 38 पैकी 34 जागा एनडीएने जिंकल्या आहेत. यातून हे स्पष्ट होत आहे की, विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींना दलित समुदायाने नाकारले आहे.

काँग्रेसवर टीका

आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘देशाने मुस्लिम लीग-माओवादी काँग्रेस (एमएमसी) ला नाकारले आहे. एकेकाळी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सारख्या व्यक्तींनी नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षातील लोक या नेत्याच्या कृतीने दुःखी आहेत. आता काँग्रेस पक्षाला कोणीही वाचवू शकत नाही. 50-60 वर्षे राज्य करणाऱ्यांना पक्षाला एक-दोन दशकांतच अशा प्रकारे नष्ट करावे, हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे.’

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट