AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला, PM मोदींचा हल्लाबोल

PM Modi : भाजपप्रणित एनडीए आघाडीने बिहारमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला, PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi
| Updated on: Nov 15, 2025 | 9:03 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या गुजराज दौऱ्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना मोदींनी म्हटले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जाणून जातीवर आधारित भाषणे देत होते. याद्वारे ते जातीवादाचे विष पसरवत असत. त्यांना वाटत होते की यामुळे त्यांना यश मिळेल, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उज्ज्वल संदेश आहे.

पंतप्रधान मोदांनी पुढे बोलताना वक्फ कायद्यावर बोलताना म्हटले की, ‘बिहारमध्ये जमीन आणि घरांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आणि नंतर वक्फ मालमत्तेत रूपांतरित केली गेली. तामिळनाडूमध्येही हजारो वर्षे जुन्या गावांना वक्फ मालमत्ता घोषित करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आम्ही वक्फबाबत कायदा मंजूर केला, त्यामुळे आता गैरप्रकार थांबणार आहे.’

बिहारच्या जनतेने जातीयवाद नाकारला

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बिहार निवडणुकीदरम्यान अनेक तेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वक्फ कायदा फाडत आम्ही जिंकल्यावर वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र बिहारच्या लोकांनी या जातीय विषाला पूर्णपणे नाकारले आहे. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वरिष्ठ नेते नितीश कुमार यांचा अपमान करत आहेत. ते अपमानास्पद भाषा वापरत आहेत. मात्र बिहारच्या जनतेने हे स्वीकारले नाही.

दलित समाजाचा एनडीएला पाठिंबा

PM मोदी पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांबाबतच्या द्वेशाचे वातावरण या निवडणुकीत दिसून आले. सर्व मतदारांनी एनडीए आणि त्यांच्या मित्रपक्षांना अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे. दलित समुदायाचे वर्चस्व असलेल्या 38 पैकी 34 जागा एनडीएने जिंकल्या आहेत. यातून हे स्पष्ट होत आहे की, विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींना दलित समुदायाने नाकारले आहे.

काँग्रेसवर टीका

आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘देशाने मुस्लिम लीग-माओवादी काँग्रेस (एमएमसी) ला नाकारले आहे. एकेकाळी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सारख्या व्यक्तींनी नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षातील लोक या नेत्याच्या कृतीने दुःखी आहेत. आता काँग्रेस पक्षाला कोणीही वाचवू शकत नाही. 50-60 वर्षे राज्य करणाऱ्यांना पक्षाला एक-दोन दशकांतच अशा प्रकारे नष्ट करावे, हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.