AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : आता तो दिवस दूर नाही…हीच मोदीची गॅरंटी, नक्षलवादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले आनंदाचे दिवे लखलखतील

PM Narendra Modi on Maoist : छत्तीसगडमधील घनदाट जंगलातील अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशातून लवकरच माओवाद हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त केला.

PM Modi : आता तो दिवस दूर नाही...हीच मोदीची गॅरंटी, नक्षलवादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले आनंदाचे दिवे लखलखतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नक्षलवादी
| Updated on: Oct 18, 2025 | 8:49 AM
Share

PM Modi on Naxalites : गेल्या 50-55 वर्षात माओवादामुळे हजारो लोकांचा हकनाक बळी गेला. कित्येक सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांमुळे प्राणाची आहुती द्यावी लागली. आपण कित्येक नवतरुण गमावले, असे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. नक्षलवादी भागात त्यांनी कधी शाळा होऊ दिली नाही की कधी रुग्णालय बांधू दिले नाही. जितके विकास कामं केली ती बॉम्बने उडवली. अनेक दशकांपासून विकासाचा किरण या भागात पोहचला नाही. एक मोठी लोकसंख्या माओवादी दहशतवादामुळे विकासापासून वंचित राहिली. पण या भागातील परिस्थिती बदलली आहे. 50-55 वर्षात ज्यांनी दिवाळी पाहिली नाही, त्यांना आता आनंदाने दिवे लावता येतील. त्यांची दिवाळी उजळून जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

नक्षलवाद हा माओवादाचा दहशतवाद

एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर भाष्य केले. आता तो दिवस नाही, जेव्हा भारत माओवाद मुक्त होईल. नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळात अर्बन नक्षलवाद फोफावला, त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या कोणत्याच घटना जगासमोर, देशासमोर येत नव्हत्या. त्यासाठी काँग्रेस सरकार मोठे सेन्सॉरशिप चालवत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

गेल्या 11 वर्षात देशातील 125 हून अधिक जिल्हे हे नक्षलप्रभावित होते. आज ती संख्या अवघ्या 11 वर आली आहे. या 11 जिल्ह्यांमधील केवळ 3 जिल्हे असे आहेत, जे सर्वाधिक नक्षलग्रस्त आहेत. केवळ 75 तासांमध्ये 303 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत. एकवेळी या 125 जिल्ह्यात केवळ गोळीची भाषा चालत असे. हे काही सामान्य नक्षली नव्हते. अत्यंत जहाल माओवादी होते. त्यांच्या डोक्यावर एक कोटी, लाखोंचे बक्षिस होते.

मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही वर्षांपर्यंत देशातील प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसा आणि माओवादाने पीडित होते. उर्वरीत देशात राज्य घटनेप्रमाणे राज्य होत होते. पण रेड कॉरिडोअरमध्ये राज्य घटनेचा नाव घेणे अवघड होते. जे आज संविधानाची प्रत डोक्याला लावून नाचतात. त्यांनी माओवादी, नक्षलवाद्यांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केले असे मी जबाबदारीने विधान करतो असा पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता बस्तर ऑलम्पिकची चर्चा

यापूर्वी छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद होता. बस्तरमध्ये त्यांच्या रक्तरंजित कारवायांचे मथळे माध्यमांत झळकत होते. इथे बॉम्बस्फोट झाला. इथे सुरक्षा रक्षक मारल्या गेले असे मथळे झळकत होते. बस्तर हा नक्षलवाद्यांचा गड होता. तिथे त्यांचेच राज्य होते. पण आज मोठा बदल झाला आहे. बस्तर ऑलम्पिकचे आयोजन तिथल्या तरुणांनी केले आहे. हजारो तरुण त्यामध्ये सहभागी झाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.