AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर फक्त विध्वंस, महाविध्वंस होईल, नरेंद्र मोदींनी पाकला खडसावलं!

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे.

...तर फक्त विध्वंस, महाविध्वंस होईल, नरेंद्र मोदींनी पाकला खडसावलं!
narendra modi
| Updated on: May 13, 2025 | 3:57 PM
Share

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्याचा परिणाम हा फक्त विध्वंस हाच असेल, असं मोदी यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे कौतुक केले.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूर हे काही सैनिकांचे सामान्य अभियान नाही. हे ऑपरेशन म्हणजे भारताची नीती, भारताची नियत तसेच भारताच्या निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत हा बुद्धाचा देश आहे. सोबतच भारत हा गुरु गोविंदसिंग यांचाही देश आहे. अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. त्यामुळेच आपल्या बहिणी, मुलींचं सौभाग्य हिसकावून घेण्यात आलं, त्यानंतर आपण दहशतवादच्या फण्याला त्यांच्या घरात घुसून नेस्तनाबूत करून टाकलं, असं मोदी म्हणाले.

100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं- मोदी

तसेच, ऑपरेशन सिंदूरवर बोलताना त्यांनी पाकिस्तानलाही खडसावलं आहे. “ते लपून आले आणि हल्ला केला. मात्र त्यांनी ज्यांना डिवचलं होतं, ती भारताची सेना आहे, हे ते विसरले होते. भारतीय सेनेने समोरासमोर जाऊन हल्ले केले आहेत. भारतीय सेनेने दहशतवादाच्या अनेक तळांना मातीत मिसळून टाकलं. 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकलं. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दहशतवाद्यांच्या आकांना आता समजलं आहे की भारतावर करडी नजर टाकली तर त्याचे परिणाम भोगावले लागतील,” असा इशाराच मोदी यांनी पाकिस्तानला दिला.

विध्वंस आणि महाविध्वंस हा एकच परिणाम

भारतावर नजर रोखली तर विध्वंस हाच एकमेव पर्याय असेल. भारतात निरापराध लोकांचे रक्त वाहत असेल तर विध्वंस आणि महाविध्वंस हा एकच परिणाम असेल. ज्या दहशतवाद्यांच्या जीवावर जे दहशतवादी बसले होते, त्या पाकिस्तानी सैन्यालाही आपण धूळ चारली आहे, अशा शब्दांत मोदी यांनी भारतीय सेनेचे कौतुक केले.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.