AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये भाजपचं पानीपत? सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व 29 जागांवर पराभव

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागत असल्याचं चित्र आहे (BJP lost all 29 seats in Gurdaspur Sunny Deol parliamentary constituency)

पंजाबमध्ये भाजपचं पानीपत? सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व 29 जागांवर पराभव
सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव
| Updated on: Feb 17, 2021 | 2:50 PM
Share

चंदिगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता पंजाबमधील महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींमध्ये बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ नगरपालिका, 109 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा झटका बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे (BJP lost all 29 seats in Gurdaspur Sunny Deol parliamentary constituency).

काँग्रेस आघाडीवर

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे (BJP lost all 29 seats in Gurdaspur Sunny Deol parliamentary constituency).

गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलच्या भाजपला नाकारलं

सनी देओल यांच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानाने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सनी देओल यांच्या मतदारसंघात सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपला अनेक ठिकाणी एकही जागा नाही

पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होत असल्याचं मतमोजनीच्या आकडेवारीतून समोर येताना दिसत आहे. अनेक महापालिका, नगरपंचायतींमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलं नाही.

कपूरथला नगरपालिकेत काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. त्याचबरोबर अकाली दलाला तीन, तर दोन अपक्ष निवडून आले आहेत. एका वॉर्डात दोन उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहे. या नगरपालिकेत भाजप आणि आम आदमी पक्षाला एकही जागेवर विजय मिळालेला नाही. जालंधरमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. फिल्लौर नगरपरिषदेत काँग्रेसने 14 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला एकाही जागावर यश आलं नाही.

मोगा येथे देखील भाजपला खातं उघडता आलेलं नाही. मात्र, इथे शिरोमणी अकाली दल काँग्रेसच्या पुढे आहे. अकाली दलाला 15 तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला आहे.

हेही वाचा : ‘खून, बलात्कार होतातच, गुंड जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढतात, सरकार अस्तित्वहीन झालंय’

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.