AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उत्तर प्रदेशमध्ये हिंसेचं नाव मास्टरस्ट्रोक ठेवलंय”, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय.

उत्तर प्रदेशमध्ये हिंसेचं नाव मास्टरस्ट्रोक ठेवलंय, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
priyanka gandhi - rahul gandhi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हिंसेचं नाव बदलून मास्टरस्ट्रोक ठेवण्यात आलंय, असं म्हणत राहुल गांधींनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झालाय, असा आरोप काँग्रेसने केलाय (Rahul Gandhi and Priyanka Gandhi criticize Yogi government over violence in UP).

दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करत उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सरकार तेच, वर्तनही तेच.” प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी म्हटलं, “काही दिवसांपूर्वी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठवला. त्यानंतर या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आता एक महिलेचा उमेदवारी अर्ज रोखण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या.”

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘हिंसा प्रदेश’ झाल्याचा आरोप केला.

“भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी लाठीकाठ्यांपासून बॉम्बपर्यंत वापर होऊन हिंसा भडकली. विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासनावरही हल्ले होताना दिसत आहेत.

पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यात ते फोनवर वरिष्ठांशी बोलताना परिस्थितीची माहिती देत आहेत. ते सांगत आहेत, “हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. यात भाजप आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे.” हा व्हिडीओ ईटवाह जिल्ह्यातील आहे.

हेही वाचा :

VIDEO: “भाजपच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले”, UP पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, तर 90 टक्के कोट्याधीश

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

व्हिडीओ पाहा :

Rahul Gandhi and Priyanka Gandhi criticize Yogi government over violence in UP

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.