AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC च्या महिला खासदाराचा पदाचा राजीनामा, पक्षातूनच झाले गंभीर आरोप

महिला खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या प्रमुखांकडे सोपवला आहे. २०१९ मध्ये मोदी लाटेतही मिमी यांनी २ लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. पण आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

TMC च्या महिला खासदाराचा पदाचा राजीनामा, पक्षातूनच झाले गंभीर आरोप
| Updated on: Feb 15, 2024 | 5:22 PM
Share

TMC MP Resigns : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मिमी चक्रवर्ती यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. अभिनेत्री आणि खासदार असलेल्या मिनी चक्रवर्ती यांनी यावेळी टीएमसीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचं कारण देत राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती या जाधवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

मिमी चक्रवर्ती यांनी सांगितले की, त्या गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अजून राजीनामा सादर केलेला नाही.

कोण आहेत मिमी चक्रवर्ती?

मिमी चक्रवर्ती यांनी अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे. मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. मिमी चक्रवर्तीने 2012 मध्ये चॅम्पियन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बंगाली इंडस्ट्रीत त्यांनी 25 हून अधिक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. त्यामुळेच मिमी यांची लोकप्रियता पाहून टीएमसीने  त्यांना 2019 मध्ये उमेदवार निवडणुकीचे तिकीट दिले होते.

2 लाख 95 हजार मतांच्या फरकाने विजय

अनुपम हाजरा या भाजप उमेदवारांने मिमी चक्रवर्ती यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण मिमी चक्रवर्ती यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय झाला. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी करत पुन्हा सत्ता काबिज केली होती. भाजप नेते अनुपम हाजरा यांचा सुमारे 2 लाख 95 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

कोणी केले गंभीर आरोप

पश्चिम बंगाल सरकारमधील राज्यमंत्री श्रीकांत महतो यांनीच खासदार मिर्मी चक्रवर्ती आणि इतर बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. मिमी चक्रवर्ती, जून मालिया, सयानी घोष, सायंतिका बॅनर्जी, नुसरत जहाँ यांसारखे नेते पैसे लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे लुटून हे नेते पक्षाची संपत्ती बनत असतील तर आम्हाला मंत्री राहायचे नाही, असे ते म्हणाले होते. या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री चोर असल्याचे लोक म्हणत आहेत. पक्ष त्या चोरांचेच ऐकेल. नवीन मार्ग शोधावे लागतील. या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल. असं देखील श्रीकांत महतो म्हणाले होते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.