तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे

तेजस्वी यादव यांनी एका वेगळ्या वातावरण निर्माण केलंय. त्यामुळे बिहारमध्ये परिवर्तन होणं अटळ आहे, असं मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय.

तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 11:21 PM

पाटणा :  आरजेडी (RJD) नेते तेजस्वी यादव (tejashwi Yadav) यांनी बिहार विधानसभा Bihar Election) निवडणुकीचं वातावरण बदलून टाकलंय. बिहारच्या जनतेला बदल हवाय, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांंनी व्यक्त केला. (Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

चंद्रकांत खैरे आज विधानसभा निवडणूक प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी करत जेडीयू आणि भाजपला टोले लगावले. बिहारमध्ये एनडीएची अवस्था अतिशय वाईट झाली असून लवकरच जेडीयूदेखील एनडीएतून बाहेर पडेल, असा दावा त्यांनी केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पण भीती वाटत असली तरी लोकांनी हक्काने मतदान करून परिवर्तन आणायचे ठरवले आहे”, असं खैरे म्हणाले.

“भाजपने महाराष्ट्रात जसं शिवसेनेला डावललं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आता नितीश कुमार यांना डावलले जात आहे. तुम्हीच मुख्यमंत्रिपदी असाल असं नितीश कुमार यांना भाजपने सांगितलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांना JDU च्या विरोधात उमेदवार उभे करण्यास सांगितलं. त्यामुळे आता नितीशकुमार गडबडले आहेत. ते लवकरच एनडीएतून बाहेर पडतील”, असा दावा खैरे यांनी केला.

“मला नितीश कुमार यांना विचारायचंय की तरुणांच्या रोजगाराच्या आश्वासन आपण दिले होते, त्याचं काय झालं?,  कोरोना काळात स्थलांतरित कामगारांसाठी आपण आणि आपल्या सरकारने काय उपाययोजना केल्या ? असे सवाल करत आपण फक्त घोषणा केल्या बाकी काही नाही”, अशी टीका खैरे यांनी केली.

“कोरोना असताना भाजपला आणि जेडीयूला निवडणुकांची एवढी घाई का झाली? महाराष्ट्रात सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या असताना इथे निवडणुका पुढे का ढकलल्या नाहीत?”, असा सवाल खैरेंनी उपस्थित केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस बिहारला आले आणि महाराष्ट्रात कोरोना घेऊन गेले”, असा टोला खैरेंनी लगावला.

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, असं भाकितही खैरे यांनी वर्तवलं. आज जामीन मिळूनही लालू जेलमध्ये आहेत, हे लोकांना पटत नाहीये, लोकांची सहानुभूती त्यांना मिळत आहे. लालूंच्या मुलाने नवं वातावरण तयार केलं आहे, असं ते म्हणाले.

“भाजपच्या मोफत लसीच्या घोषणेसाठी निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. निवडणूक म्हणून फक्त बिहारला लस मग सगळयांना लस का नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही, पण इथे लस मोफत, यातूनच सरकारचं वर्तन आपल्याला दिसून येतं. पंतप्रधान मोदींची भाषणे हवी तशी होत नाहीत”, असा टोलाही त्यांनी सरतेशेवटी लगावला.

(Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

संबंधित बातम्या

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.