AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

आता दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांना अस्थमा किंवा इतर त्रास जाणवू शकतो, असे डॉक्टराचे म्हणणे आहे. | Sonia Gandhi

दिल्लीत प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती; सोनिया गांधींना दिल्लीबाहेर जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला
| Updated on: Nov 20, 2020 | 12:39 PM
Share

नवी दिल्ली: दिल्लीत वायू प्रदूषणाने गंभीर पातळी गाठल्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना डॉक्टरांनी काही दिवसांसाठी शहराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी लवकरच हवापालटासाठी गोवा किंवा चेन्नई येथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Poor air quality forces Sonia Gandhi to shift out of Delhi on doctors’ advice)

सोनिया गांधी यांच्या छातीत संसर्ग (chronic chest infection) झाला आहे. परिणामी दिल्लीतील वायू प्रदूषण त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सोनिया गांधी शुक्रवारी दुपारी दिल्ली सोडतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी असण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. यासाठी सोनिया गांधी सध्या औषधांचा हेवी डोस घेत आहेत. मध्यंतरी त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते. मात्र, तेव्हापासून सोनिया गांधी यांची प्रकृती नाजूकच आहे.

आता दिल्लीतील प्रदूषणामुळे त्यांना अस्थमा किंवा इतर त्रास जाणवू शकतो, असे डॉक्टराचे म्हणणे आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी काही दिवस दिल्लीपासून दूर राहावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे सध्या पक्षात अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते पक्षनेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत आता सोनिया गांधी यांना दिल्ली सोडून जावे लागणार आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे ‘आत्मपरीक्षण’ लांबणवीर पडण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळला

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात तणाव निर्माण झाला आहे. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याला काही नेत्यांना पाठिंबा दिला होता. तर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांनी कपिल सिब्बल यांच्यावर हल्ला चढवला होता. कपिल सिब्बल यांना काँग्रेसची कार्यपद्धती पटत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे, अशी टीका काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाची नांदी; सोनिया गांधींच्या मर्जीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्या, बडे नेते सोनिया गांधींकडे जाणार?

(Poor air quality forces Sonia Gandhi to shift out of Delhi on doctors’ advice)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.