AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसमिस… केवळ एका वाक्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळली; आता हायकोर्टात जावं लागणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी राहुल गांधी यांनी याचिकेतून केली होती.

डिसमिस... केवळ एका वाक्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळली; आता हायकोर्टात जावं लागणार
Rahul GandhiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 2:13 PM
Share

सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी सरनेम प्रकरणी मानहानीच्या खटल्यात सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची ती याचिका फेटाळून लावली आहे. डिसमिस.. असा एकच शब्द उच्चारत न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. उद्याच राहुल गांधी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

23 मार्च रोजी राहुल गांधी यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी 3 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यता यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली होती. मात्र, कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा झटका दिला आहे.

पर्याय आहेत

सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली असली तरी राहुल गांधी यांच्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय आहेत. सेशन कोर्टाकडून याचिका फेटाळून लावणं याचा अर्थ मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय लागू राहील. कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम राहिली आहे. त्यामुळे आता त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. उच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर मग मात्र राहुल गांधी यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार आहेत.

काय आहे प्रकरण?

2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी मोदी सरनेमवरून टीका केली होती. सर्वच चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल त्यांनी केला होता. त्याला गुजरातचे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत सूरत कोर्टात याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या विधानाने मोदी समाजाचा अपमान झाल्याचं पूर्णेश मोदी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तर मी एक राजकारणी आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो. मी हे विधान हेतूपूर्वक केलेलं नाही. कोणत्याही समाजाला उद्देशून केलेलं नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने या प्रकरणी चार वर्षानंतर निकाल देत राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.