AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 11 जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar)

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 11 जणांचा मृत्यू
| Updated on: Feb 12, 2021 | 7:37 PM
Share

चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत आतापर्यंत 36 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या मते, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).

दरम्यान, या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना 3 लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केली आहे. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी 1 लाखांचे आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.

“तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याची घटना दुखद आहे. या दुखद समयी पीडित परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक बरे होतील, अशी मला आशा आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे”, असं पंतप्रधान मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).

दरम्यान, या घटनेप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील पीडितांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. कारखान्यात अडकलेल्या लोकांबाबत विचार करुन खूप दुखी आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करुन लवकरात लवकर पीडितांना बाहेर काढावं”, असं राहुल गांधी ट्विटरवर म्हणाले.

हेही वाचा : मोठी बातमी: भुसावळमध्ये जयंत पाटलांच्या गाड्यांचा ताफा अडवला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याविरोधात रोष

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.