AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 11 जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar)

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 11 जणांचा मृत्यू
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 12, 2021 | 7:37 PM
Share

चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत आतापर्यंत 36 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या मते, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).

दरम्यान, या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना 3 लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केली आहे. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी 1 लाखांचे आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.

“तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याची घटना दुखद आहे. या दुखद समयी पीडित परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक बरे होतील, अशी मला आशा आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे”, असं पंतप्रधान मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).

दरम्यान, या घटनेप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील पीडितांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. कारखान्यात अडकलेल्या लोकांबाबत विचार करुन खूप दुखी आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करुन लवकरात लवकर पीडितांना बाहेर काढावं”, असं राहुल गांधी ट्विटरवर म्हणाले.

हेही वाचा : मोठी बातमी: भुसावळमध्ये जयंत पाटलांच्या गाड्यांचा ताफा अडवला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याविरोधात रोष

Follow Us
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?