AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुपती : सर्वात श्रीमंत मंदिराचं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी, व्याजातून 533 कोटींची कमाई!

तिरुपती देवस्थान या सर्वात श्रीमंत मंदिरानं आपलं बजेट सादर केलं आहे. 2021 - 2022 साठी मंदिर समितीनं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे.

तिरुपती : सर्वात श्रीमंत मंदिराचं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी, व्याजातून 533 कोटींची कमाई!
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 28, 2021 | 11:15 PM
Share

नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थान या सर्वात श्रीमंत मंदिरानं आपलं बजेट सादर केलं आहे. 2021 – 2022 साठी मंदिर समितीनं 2 हजार 937 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली TTD बोर्डाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.(Tirupati temple approves budget of Rs 2,937 crore)

मंदिरात 2020 – 21 मध्ये दानपेटी आणि अन्य देणग्यांमधून 1 हजार 131 कोटी रुपयांचं दान मिळाल्याचा अंदाज आहे. कुटीर दान योजनेद्वारे गैर-लाभाची संपत्ती आणि रिकाम्या कॉटेजसाठी 100 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे. तर ठेवींवरील व्याजातून 533 कोटी रुपये व्याज मिळण्याचा अंदाज आहे. तर प्रदासातून मिळालेली रक्कम 375 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे. दर्शनातून 210 कोटी रुपये, कल्याणटक्कामधून 131 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज आहे.

बोर्डाने हा निर्णय घेतला आहे की, जर अयोध्या राम मंदिर निर्माण ट्रस्ट TTDला जमीन अधिग्रहणासाठी पुढे आलं तर ते अयोध्येत श्रीवारी मंदिर किंवा भजन मंदिर वा सुविधा केंद्राचं निर्माण करु शकतं. त्याचबरोबर TTDने ही घोषणाही केली आहे की, मुंबई आणि जम्मू-काश्मीरमध्ये श्रीवारी मंदिरांच्या निर्माणासाठी लवकरच भूमिपूजन केलं जाईल. त्यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणूनही घोषणा करण्याची परवानगी दिली आहे. त्याबाबत केंद्राकडेही शिफारस केली जाणार आहे.

तिरुपती मंदिराच्या बोर्डानं TTD कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाचाही निर्णय घेतला आहे. बोर्डाने 14 एप्रिलला तिरुमला मंदिरात अर्जिता सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बोर्डाने TTD द्वारे संचलित सर्व सहा वेद पाठशाळांना ‘श्री व्यंकटेश्वरम वेद विज्ञान पीठम’च्या नावाने ओळखण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसंच वर्तमानात सर्व शाळांना वैदिक शिक्षकांचा पगार 22 हजारावरुन 35 हजार 150 रुपयांपर्यंत वाढवला आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्रातील तरुण उद्योगपतीची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक

बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू

Tirupati temple approves budget of Rs 2,937 crore

Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?