AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडावळ्या बांधता बांधता नवरदेवाला आला हार्ट अटॅक; वराती ऐवजी घरातूनच निघाली…

उत्तर प्रदेशात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका तरुणाला लग्नाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ज्या घरातून त्याची वरात निघायची तिथून त्याची अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे संपूर्ण गावच हळहळ व्यक्त करत आहे.

मुंडावळ्या बांधता बांधता नवरदेवाला आला हार्ट अटॅक; वराती ऐवजी घरातूनच निघाली...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2023 | 9:42 AM
Share

बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक, दुर्देवी आणि तितकीच वेदनादायी घटना घडली आहे. लग्नाची वरात निघणार होती. त्यामुळे मुंडावळ्या बांधत असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पोटचा गोळा गेल्याची बातमी ऐकून नवरदेवाच्या आईवडिलांनी आणि कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. जिथून वरात निघायची होती, त्या ठिकाणाहून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली. या दुर्देवी घटनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जरवल रोड क्षेत्र परिसरातील अटवा गाव येथील ही घटना आहे. रामलाल यांचा मुलगा राजकमल याचं काल लग्न होतं. क्योलीपरवा अटैसा गावात त्याच्या लग्नाची वरात जाणार होती. त्यामुळे घरात लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. हळदीचा कार्यक्रमही दणक्यात झाला होता. पै पाहूणेही लग्नाला आले होते. आता थोड्याच वेळात राजकमलची वरात निघणार होती. त्यामुळे राजकमलचा मेकअप करण्यात येत होता. त्याला लग्नाचे कपडेही घालण्यात आले होते. त्यानंतर राजकमलच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जात होत्या. मुंडावळ्या बांधत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे तो खाली कोसळला.

आक्रोश आणि मातम

राजकमल खाली कोसळल्याने त्याला तात्काळ उचलून मुस्तफाबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच राजकमलला मृत घोओषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे ज्या घरात लग्नाचा जल्लोष होता तिथे रडारड आणि आक्रोश सुरू झाला. ही धक्कादायक माहिती मिळताच वधूच्या घरचे लोकही राजकमलच्या घरी पोहोचले.

वडील कोलमडले

अशी धक्कादायक घटना घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. राजकमल याचा मृत्यू झाल्याने त्याच्या लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्याची वेळ आली. अत्यंत दु:खद अंतकरणाने सर्वांनी राजकमलला अखेरचा निरोप दिला. मुलाच्या निधनाने रामलाल कोलमडून गेले आहेत. रडून रडून त्यांचे हाल झाले आहेत. हाच दिवस पाहायचा बाकी होता का? आज मुलगा असता तर घरात आनंदाचं वातावरण असतं, असं ते म्हणत आहेत.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल