AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today: “…तरच महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावेल”, केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं ‘बुलेट भविष्य’

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला बुलेट ट्रेनचा चेंडू मंत्री वैष्णव यांनी सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. वर्ष 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावेल अशी शक्यता वैष्णव यांनी वर्तविली आहे.

What India Thinks Today: …तरच महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावेल, केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं 'बुलेट भविष्य'
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 6:48 PM
Share

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे (Bullet Train) काम प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातील सरकार मान्यता देईल त्यादिवसापासून त्वरित कामास सुरुवात होईल असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला बुलेट ट्रेनचा चेंडू मंत्री वैष्णव यांनी सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. वर्ष 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावेल अशी शक्यता वैष्णव यांनी वर्तविली आहे. टीव्ही 9 ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टूडे’ या चर्चासत्रात मंत्री वैष्णव सहभागी झाले होते. बुलेट ट्रेन, 5G नेटवर्क, 6 G नेटवर्क, सेमीकंडक्टरची देशांतर्गत निर्मिती, एक कोटी रोजगाराच्या (job) संधी आदी विषयांवर मंत्री वैष्णव यांनी थेट भाष्य केलं.

…तर, कठोर कारवाई

अग्निपथ योजनेवरुन रेल्वे संपत्तीला युवकांनी लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर मंत्री वैष्णव यांनी भाष्य केलं आहे. रेल्वेमुळे सर्वसामान्यांना माफक दरांत दळवळणाच्या सुविधा उपलब्ध होतात. विमान जिथं पोहोचू शकत नाही आणि विमानाचं खर्च पेलू शकत नाही अशा वर्गाला रेल्वे मुळं प्रवास सुकर झाला आहे. रेल्वेचे कायदे कठोर करण्याची आवश्यकता आहे. आंदोलनकर्त्यांची बाजू निश्चितपणे ऐकून घेतली जाईल. मात्र, रेल्वे संपत्तीला कुणीही नुकसान पोहोचू नये आणि हिंसेचा मार्ग अवलंबू नये.

भारतात 5G स्वस्त

चालू वर्षाच्या अखेरीस देशातील 20-25 शहरांत 5G नेटवर्क सुरू होईल. जगाच्या तुलनेत भारतातील 5G हे 10 पट स्वस्त असेल असे वैष्णव यांनी म्हटलं आहे.

वंदे भारतचे जाळे

भारतीय निर्मितीची वंदे भारत एक्स्प्रेस प्रगतीपथावर आहे. काळाप्रमाणे प्रगती होत आहे. लवकरच नव्या रेल्वे दाखल होणार आहेत. देशाचे सर्व भाग वंदे भारत एक्स्प्रेसनं जोडले जातील असे वैष्णव यांनी म्हटलं आहे.

भारत सेमीकंडक्टर हब

भारत सेमीकंडक्टरचं हब बनेल. निर्मिती बाबतचा करार लवकरच प्रत्यक्षात येईल. चालू वर्षाच्या अखेरीस करार पूर्णत्वास जाईल आणि प्रत्यक्षात निर्मितीला सुरुवात होईल. सेमीकंडक्टरच्या निर्मितीत भारत जगाला दिशा जाईल. आगामी काळात जगातील सर्वाधिक सेमीकंडक्टरची निर्मिती भारतात होईल. त्यामुळे सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात चार-पाच वर्षाच एक कोटी रोजगारांची उपलब्धता होईल. मुबलक रोजगार निर्मिती सोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव घटतील असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.