AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणार्कच्या सूर्य मंदिरांचा तो भाग 122 वर्ष का होता बंद? काय आहे रहस्य? मंडप उघडताच…

कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनारी आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराचा जो मंडप 122 वर्षांपासून बंद करून ठेवण्यात आला होता, त्या मंडपाचं नाव नृत्य मंडप असं आहे.

कोणार्कच्या सूर्य मंदिरांचा तो भाग 122 वर्ष का होता बंद? काय आहे रहस्य? मंडप उघडताच...
कोर्णाक सूर्य मंदिर Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2025 | 7:50 PM
Share

कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरीजवळ असलेलं 13 व्या शतकातील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. या मंदिराचा मुख्य हॉल अर्थात मंडप गेल्या 122 वर्षांपासून बंद आहे. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला सूर्य मंदिराच्या भिंतीला आणि छताला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे हे मंदिर कोसळू शकतं अशी भीती त्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांना होती, त्यामुळे त्यांनी मंदिराचे चारही प्रवेशद्वार बद केले आणि आतील संरचनेवर दबाव येऊन हे मंदिर पडू नये यासाठी त्यामध्ये वाळू भरण्यात आली. कोणार्कच्या सूर्य मंदिराचं निर्माण तेराव्या शतकात करण्यात आलं होतं. हा एक अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्यामुळे त्याचं जतन होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या काळात हा उपाय करण्यात आला होता, हा एक अस्थायी स्वरुपाचा उपाय होता, मात्र नंतरच्या काळात या मंदिरासाठी इतर कुठल्याही स्वरुपाची उपाय-योजन करण्यात आली नाही. मात्र आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, हा मंडप उघडून त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनारी आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराचा जो मंडप अस्थानी काळासाठी बंद करून ठेवण्यात आला होता, त्या मंडपाचं नाव नृत्य मंडप असं आहे, त्याला जगमोहन असं देखील म्हटलं जातं. असं म्हणतात की जो मंडप तब्बल 122 वर्षांपासून बंद होता, तो या सूर्य मंदिराचा मुख्य भाग आहे. हा मंडप तब्बल 128 फूट उंच आहे. या मंडपाची निर्मिती ही नाट्य आणि नृत्य प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. या मंडपामध्ये सूर्य देवांच्या मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली होती. कधी काळी हे मंदिर, अनुष्ठान, अवकाश संशोधन, आणि अध्यात्माचं केंद्र होतं. मात्र हे मंदिर शेकडो वर्षांपासून समुद्राच्या किनारी असल्यामुळे चक्रीवादळं, खारे पाणी आणि बाष्पयुक्त हवा यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात झिज झाली. त्यामुळे 1903 साली इंग्रजांनी हा मंडप वाळू आणि विटांनी भरून बंद केला होता.

दरम्यान एका रिपोर्टानुसार आता पुन्हा एकदा आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, हा मंडप उघडून त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान असाच एक प्रयोग 50 वर्षांपूर्वी देखील झाला होता. हवेतील ओलाव्यामुळे या मंदिराची मोठ्या प्रमाणात झिज झाली आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.