AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026 : जग कुरुक्षेत्र बनलंय पण PM मोदींकडे शांततेचा मंत्र, टीव्ही9 चे CEO आणि MD बरुण दास यांचे भाष्य

WITT Summit 2026 : टीव्ही9चे सीईओ आणि एमडी बरूण दास यांनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT Summit 2026)’ या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. तसेच विविध मुद्यांवरही भाष्य केले.

WITT Summit 2026 : जग कुरुक्षेत्र बनलंय पण PM मोदींकडे शांततेचा मंत्र, टीव्ही9 चे CEO आणि MD बरुण दास यांचे भाष्य
Barun Das WITT Summit 2026Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 23, 2026 | 9:49 PM
Share

टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) या समिटचे नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. टीव्ही9चे सीईओ आणि एमडी बरूण दास यांनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT Summit 2026)’ या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल आणि आतापर्यंतच्या 8,932 दिवसांच्या कार्यकाळासह देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे नेते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच आजच्या युद्धग्रस्त वातावरणात पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. पश्चिम आशियातील युद्धामुळे अस्थिरता वाढली असून जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे ‘फ्यूल, फूड आणि फायनान्स’ हे तीन घटक या संघर्षाच्या प्रभावाखाली आले आहेत. ऊर्जा पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असून मानवतेसमोर मोठे संकट उभे राहू शकते.

टीव्ही9च्या सीईओंनी सांगितले की इतिहासात आपण दोन महायुद्धांचा सामना केला आहे. याशिवाय 1973 मधील अरब तेल संकट, 1979 मधील इराणी क्रांती आणि 1990 मधील खाडी युद्धही जगाने पाहिले आहे. मात्र आजचा जागतिक संकट यापेक्षाही मोठा असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम आशियातील युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता असून अशा अनिश्चिततेत भारत काय विचार करतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

बरुण दास यांनी नमूद केले की पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा जगाला स्मरण करून दिले आहे की संवाद आणि कूटनीती हाच शांततेचा सर्वात योग्य मार्ग आहे. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधत असून या गंभीर संकटाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक अस्थिरतेच्या काळातही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत केवळ प्रगती करत नाही, तर जगाला स्थिर करण्यासही मदत करत आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा ही संवादावर आधारित आहे, आधिपत्यावर नाही. त्यांनी या संदर्भात महाभारत आणि भगवद्गीतेचे महत्त्वही अधोरेखित केले.

दास यांनी सांगितले की,मी मोदी यांच्या नेतृत्वशैलीतून तीन महत्त्वाचे मंत्र शिकलो आहे. ‘रिटर्न टू गव्हर्नन्स’, ‘मल्टिप्लायर इफेक्ट’ आणि ‘सीडीआर’ (सुधारित कार्यपद्धती). आज हे देशाच्या डीएनएमध्ये समाविष्ट झाले आहे. त्यांनी ‘इंडिया फर्स्ट’ दृष्टिकोनाचा उल्लेख करताना सांगितले की आज जग एका नव्या ‘कुरुक्षेत्रा’सारखे दिसत आहे आणि अशा वेळी ‘समबुद्धी’ हा नवीन मार्गदर्शक मंत्र ठरू शकतो.

बरुण दास यांनी स्पष्ट केले की शांती म्हणजे सर्वांशी समान वागणूक आणि निष्पक्षता. भारताच्या परराष्ट्र धोरणात ‘5-S’ म्हणजेच सन्मान, संवाद, सहकार्य, शांती आणि समृद्धी यांचा प्रभाव दिसून येतो. आज जागतिकीकरणाऐवजी राष्ट्रवादावर अधिक भर दिला जात असला, तरी भारत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवतो.

त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्यासमोर देशांतर्गतही अनेक आव्हाने आहेत – गरीबी आणि समावेश, आर्थिक व पायाभूत विकास, हरित ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञान (विशेषतः एआय). मात्र गेल्या सुमारे 12 वर्षांत या सर्व क्षेत्रांत भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने देश वाटचाल करत आहे.

शेवटी त्यांनी सांगितले की लोकशाहीत मतभेद असतात, पण ती नेहमी राष्ट्रीय हिताशी जोडलेली असावी. आज भारत नव्या जागतिक व्यवस्थेचे केंद्र बनत आहे. त्यामुळे या वर्षीच्या शिखर परिषदेचा विषय ‘भारत आणि जग’ असा आहे. त्यांनी नमूद केले की आज भारताची भूमिका केवळ महत्त्वाची नाही, तर जागतिक परिस्थिती घडवणारी ठरत आहे, आणि हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत