Water crises: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष
टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
प्राजक्ता ढेकळे |
Updated on: Jun 10, 2022 | 10:45 AM
Share
मेळघाटतही पाण्याचा मोठा दुष्काळ जाणवत आहे. मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसून आले आहेत.
1 / 6
या गावाची लोकसंख्या 1500 एवढी असून या रागावता केवळ दोनच विहिरी आहे.मात्र त्याही कोरड्या पडल्या आहेत.
2 / 6
गावाला दररोज 2-3 टँकरच्या पाण्यावर दिवस काढावा लागत असल्याचे समोर आले आहे.
3 / 6
टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
4 / 6
गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून कोरड्या विहीरीत टँकरचे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र आपल्याला पाणी मिळेल की नाही या चिंतेपोटी नागरिक विहिरीच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीनं उभे राहत टँकर मधून पडणारे पाणी उपसत आहे
5 / 6
अनेक ठिकाणी नागरिक आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी मिळवण्याचा पर्यटन करताहेत