AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ बघून आले अन् अख्ख्या कुटुंबाने दिल्या ‘मेजर इक्बाल जिंदाबाद’च्या घोषणा; चाहते संतप्त

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' हा चित्रपट पाहिल्यानंतर एका कुटुंबाने 'मेजर इक्बाल जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत. या कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Updated on: Mar 24, 2026 | 2:08 PM
Share
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा बाप ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने भारतात कमाईचा 500 कोटींचा आणि जगभरात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. परंतु एक कुटुंब या चित्रपटावर खूप नाराज आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा बाप ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने भारतात कमाईचा 500 कोटींचा आणि जगभरात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. परंतु एक कुटुंब या चित्रपटावर खूप नाराज आहे.

1 / 6
युकेमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी कुटुंबाने रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. या कुटुंबाने आदित्य धरच्या या चित्रपटाला 'फालतू' असं म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी व्हिडीओत मेजर इक्बाल जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

युकेमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी कुटुंबाने रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. या कुटुंबाने आदित्य धरच्या या चित्रपटाला 'फालतू' असं म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी व्हिडीओत मेजर इक्बाल जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

2 / 6
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच कुटुंबाने 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं कौतुक केलं होतं. परंतु आता 'धुरंधर 2'वर ते टीका करत आहेत. हा फक्त ठराविक लोकांना खुश करणारा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच कुटुंबाने 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं कौतुक केलं होतं. परंतु आता 'धुरंधर 2'वर ते टीका करत आहेत. हा फक्त ठराविक लोकांना खुश करणारा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय.

3 / 6
या व्हिडीओमध्ये एकानंतर एक व्यक्ती समोर येते आणि म्हणते, "थर्ड क्लास, मी माझ्या आयुष्यात इतका घाणेरडा चित्रपट पाहिला नव्हता. तुम्हाला माहीत आहे ना, मेजर इक्बालने काय म्हटलं होतं? आम्ही पुन्हा येणार, पुन्हा घुसणार आणि पुन्हा मारणार. घाणेरडा आणि थर्ड क्लासपेक्षाही अजून कोणता वाईट शब्द असेल तर तो या चित्रपटासाठी आहे."

या व्हिडीओमध्ये एकानंतर एक व्यक्ती समोर येते आणि म्हणते, "थर्ड क्लास, मी माझ्या आयुष्यात इतका घाणेरडा चित्रपट पाहिला नव्हता. तुम्हाला माहीत आहे ना, मेजर इक्बालने काय म्हटलं होतं? आम्ही पुन्हा येणार, पुन्हा घुसणार आणि पुन्हा मारणार. घाणेरडा आणि थर्ड क्लासपेक्षाही अजून कोणता वाईट शब्द असेल तर तो या चित्रपटासाठी आहे."

4 / 6
"हा चित्रपट फक्त भारतीय मीडियाला खुश करण्यासाठी बनवला आहे. याआधीही पाकिस्तानविरोधी चित्रपट बनले आहेत. परंतु याच्या इतका वाईट कोणताच नव्हता. मी आताच एका पाकिस्तानी दिग्दर्शकाशी बोललो, त्यांनी सांगितलं की चित्रपटात जे दाखवलं तसं काहीच सत्य नाही", असं दुसरी व्यक्ती सांगते.

"हा चित्रपट फक्त भारतीय मीडियाला खुश करण्यासाठी बनवला आहे. याआधीही पाकिस्तानविरोधी चित्रपट बनले आहेत. परंतु याच्या इतका वाईट कोणताच नव्हता. मी आताच एका पाकिस्तानी दिग्दर्शकाशी बोललो, त्यांनी सांगितलं की चित्रपटात जे दाखवलं तसं काहीच सत्य नाही", असं दुसरी व्यक्ती सांगते.

5 / 6
यानंतर व्हिडीओमध्ये संपूर्ण कुटुंबीय मिळून 'मेजर इक्बाल जिंदाबाद'च्या घोषणा देऊ लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सत्य कटूच असतं', असं एकाने म्हटलंय. तर 'पाकिस्तानविरोधी आहे हे माहीत असतानाही कशाला बघितलं', असा सवाल दुसऱ्याने केला.

यानंतर व्हिडीओमध्ये संपूर्ण कुटुंबीय मिळून 'मेजर इक्बाल जिंदाबाद'च्या घोषणा देऊ लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सत्य कटूच असतं', असं एकाने म्हटलंय. तर 'पाकिस्तानविरोधी आहे हे माहीत असतानाही कशाला बघितलं', असा सवाल दुसऱ्याने केला.

6 / 6
Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...