AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pension Bill : राज्यातील 653 माजी मंत्री, आमदारांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे सरकारकडून 30 कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी

माजी आमदार आणि मंत्र्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंत्र्यांच्या पेन्शन विधेयकाला (Pension Bill) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजुरी दिली आहे.

Pension Bill : राज्यातील 653 माजी मंत्री, आमदारांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे सरकारकडून 30 कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2022 | 10:54 AM
Share

मुंबई : माजी आमदार आणि मंत्र्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंत्र्यांच्या पेन्शन विधेयकाला (Pension Bill) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता माजी आमदार आणि मंत्र्यांना दर महिन्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळणार आहे. एवढेच नव्हे तर माजी आमदार आणि मंत्र्यांपैकी किती जण हयात आहेत? याची पडताळनी करून निवृत्तीवेतनाची (Pension) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी आमदार, माजी कॅबिनेट मंत्री, माजी राज्यमंत्री, विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, विधानपरिषदेचे माजी सभापती, माजी उपसभापती अशा सर्वच जणांचा समावेश आहे. यामुळे राज्यावर आणखी अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.माजी आमदार आणि मत्र्यांना पेन्शन देण्यासाठी राज्य सरकारने तीस कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी दिली आहे.

राज्यावर कर्जाचा बोजा

एकीकडे राज्यावर आधीच मोठा कर्जाचा बोजा आहे. दुसरीकडे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोमुळे होणारी वाहतुककोंडी मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएला 60 हजार कोटींचं कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातील 12 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची हमी शासन घेणार आहे. राज्याच्या विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात आधीच कर्ज घेण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदारांच्या पेंन्शसाठी पेन्शन विधेयकाला मंजुरी दिली आहे. यावर आता सर्वसामान्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे सरकारकडून निर्णयाचा धडाका

नवे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे सरकारमधील काही निर्णयला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा हे निर्णय नव्या सरकारने घेतले आहेत. ज्यामध्ये पूर्वी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात आले होते. आता ते छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. तसेच उस्मानाबादचे नामकरण धाराशिव हे कायम ठेवण्यात आले आहे. यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींचं कर्ज उभारण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा