अभिनेते आशुतोष राणा निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई : राजकीय, सामजिक प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडणारे अभिनेते आशुतोष राणा राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. या चर्चांवर अखेर आशुतोष राणा यांनीच विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, राजकारणात येणार का, या प्रश्नाचे राणा यांनी उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवासंपासून माध्यमांमधून मी 2019 ची […]

अभिनेते आशुतोष राणा निवडणुकीच्या रिंगणात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : राजकीय, सामजिक प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडणारे अभिनेते आशुतोष राणा राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. या चर्चांवर अखेर आशुतोष राणा यांनीच विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, राजकारणात येणार का, या प्रश्नाचे राणा यांनी उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवासंपासून माध्यमांमधून मी 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे अंदाज बांधले जात आहेत. कुणी म्हणतंय, मी जबलपूरमधून निवडणूक लढेन, कुणी म्हणतंय होशंगाबाद-नरसिंगपूरमधून लढेन, तर कुणी म्हणतंय आणखी कुठल्यातरी जागेवरुन लढेन.” असे म्हणत आशुषतोष राणा यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे.

शालेय जीवनापासूनच मला राजकारणात रस आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात माझे जवळचे मित्र आहेत आणि ते त्या त्या पक्षात महत्त्वाच्या पदावर आहेत. या मित्रांशी दशकांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवं नाही आणि राजकारणाची चाल, चित्त आणि चिंतन मी चांगल्याप्रकारे जाणतो. अनेकजण अभिनेत्यापासून राजकीय नेते बनलेत, मात्र माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे की, मी नेत्यापासून अभिनेता बनलो आहे. काँग्रेस, भाजपमध्ये माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी कधीच मला पक्षात येण्यासंदर्भात विचारले नाही आणि मीही त्यांच्याशी कधी राजकारणाशी संबंधित चर्चा केली नाही.” असे आशुतोष राणा म्हणाले.

राजकीय प्रवेशाच्या चर्चा का होत आहेत, हेही अभिनेते आशुतोष राणा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “या चर्चा होतात, याचे कारण मी अभिनेता असूनही परमपूज्य गुरुदेव दद्दाजींमुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय असतो. या कामांमुळे मी समाजातील विविध गोष्टीत सक्रीय सहभाग नोंदवत असतो. मात्र, राजकारणाशी माझा तेवढाच संबंध आहे, जेवढा लोकशाही देशातील सर्वसामान्य लोकांचा असतो. सर्वसामान्य माणसं विचार आणि मतांबाबत सजग असतो, ज्यामुळे देशाची अखंडता आणि अस्मिता टिकून राहते.”

“भविष्यात काय होईल माहित नाही. मात्र, सध्यातरी मी अभिनेताच आहे. अभिनयात मला आनंद मिळत आहे आणि अभिनयातून माझं अजून मन भरलं नाही. त्यामुळे माझ्या राजकीय सक्रियतेच्या चर्चांना पूर्णविराम मिळावा.”, असे स्पष्ट करत अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आशुतोष राणा यांंचं स्पष्टीकरण :

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.