हातातून सत्ता गेली तरी उद्धव ठाकरेंचे दौरे कशासाठी? आदित्य ठाकरेंनी कारण सांगितलं…

सत्ता हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे दौरे का करत आहेत? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. वाचा...

हातातून सत्ता गेली तरी उद्धव ठाकरेंचे दौरे कशासाठी? आदित्य ठाकरेंनी कारण सांगितलं...
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 11:12 AM

मुंबई : आधी चांगला पाऊस पडला म्हणून बळीराजा खूश होता. मान्सून चांगला असल्याने पाण्याची कमतरता नाही, असं वाटू लागलं. वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला, आता पिकं चांगली येणार म्हणून शेतकरी आनंदी होता. पण बघता बघता परतीच्या पावसाने जोर धरला आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. अशात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकसानग्रस्त भागात दौरा करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सत्ता हातून गेल्यानंतर ठाकरे हे दौरे का करत आहेत? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) उत्तर दिलंय.

आदित्य काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामागील कारण सांगितलं. आता जरी आम्ही विरोधीपक्षात असलो तरी राज्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेणं आमची जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान म्हणून आम्ही हे दौरे करतोय. शेतकऱ्यांसोबत त्यांच्या बांधावर उभे राहतोय. बळीराजा आज हवालदिल झालाय. त्याच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही आदित्य यांनी केली आहे.

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारा आमच्या सरकार होतं. आताचं सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिंदे सरकारचा फक्त घोषणायंत्र झालं आहे. फक्त घोषणाबाजी केली जाते. पण कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी केली जात नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.

दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि फक्त तारखा पाहायला मिळतात. कृषिमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. राजकारण दूर ठेवा आणि आधी शेतकऱ्यांना मदत करा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.