AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटकेंची उमेदवारी, शिंदे कात्रीत? फायदा की तोटा? 2 कारणं, ज्यावर भविष्य!

एकिकडे सहानुभूतीचं राजकारण तर दुसरीकडे सत्तेसाठी खोके घेतल्याचा आरोप... येणारी प्रत्येक निवडणूक शिंदेंसाठी गुंता वाढवणारी ठरणार. अंधेरी ही लिटमस टेस्ट!

ऋतुजा लटकेंची उमेदवारी, शिंदे कात्रीत? फायदा की तोटा? 2 कारणं, ज्यावर भविष्य!
Image Credit source: social media
| Updated on: Oct 13, 2022 | 1:29 PM
Share

मुंबईः नारायण राणे असो की छगन भुजबळ… एकदा शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलं की पराभवाचं शुक्लकाष्ठ मागे लागतं. हा इतिहास अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. ठाकरे घराण्यातील राज ठाकरेही (Raj Thackeray) फार भरारी घेऊ शकले नाहीत. त्यामुळेच शिंदे गटाच्या नेत्यांना वारंवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात येतंय. तर आम्ही बाहेर पडल्याने शिवसेना गलितगात्र झाल्याचं शिंदे गटाकडून दर्शवण्यात येतंय. घोडा मैदान सामोर आहे. अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By poll) मतदार संघाची निवडणूक आगामी महापालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट मानली जातेय.

येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं. त्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख.

शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलं. ऋतुजा लटके या महापालिकेत क्लार्क पदावर कार्यरत असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागतोय. मात्र पालिकेतील अधिकाऱ्यांकडून हा राजीनामा मंजूर करण्यात येत नाहीये.

हे प्रकरण कोर्टात गेलंय. शिंदे गट आणि भाजप राजीनामा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं घाणेरडं राजकारण करतंय, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. पण ऋतुजा लटके यांना उमेदवारी न मिळणं शिंदे गटासाठी फायद्याचं की तोट्याचं? असा विचार आणखी गुंता वाढवणारा ठरतोय…

फायदा की तोटा?

1. म्हणजे बघा, ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळाली तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. कारण एक तर उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीबद्दल सहानुभूती. त्यातच रमेश लटके यांच्या विधवा पत्नी असल्याने ऋतुजा लटके यांच्याबद्दल सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना होईल. त्यामुळे ऋतुजा लटकेंची उमेदवारी शिंदे गटासाठी तोट्याचीच समजली जातेय.

2. शिवसेना आरोप करतेय, त्यानुसार खऱंच ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीत शिंदे गटाकडून खोडा घालण्यात येत असेल तर हेसुद्धा सत्ताधाऱ्यांसाठी विशेषतः शिंदेंसाठी धोकादायक आहे. शिंदे गटाने आतापर्यंत बंडाची अनेक कारणं दिली. हिंदुत्व, खंजीर, उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती आदी कारणं देऊन भाजपसोबत सत्तेत आले. पण आता सत्ता-महत्ता सर्वकाही असताना शिंदे गटाच्या खेळीकडे जनतेचं लक्ष आहे. सत्तेत असतानाही शिवसेनेच्या वाटेत खोडा घालणं, हे जनतेलाही रुचणारं नाही. ज्याचा परिणाम शिंदे गटाला आगामी निवडणुकीत भोगावा लागू शकतो.

भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची आधी चर्चा होती. पण अद्याप याची घोषणा झालेली नाही. आता ऐनवेळी शिंदे गटातर्फे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरतील, अशीही चर्चा सुरु आहे. कारण अंधेरी निवडणुकीसाठीच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात यावं, अशी घाई शिंदे गटाकडून करण्यात आली. ऋतुजा लटकेंना शिंदे गट आपल्याकडे खेचतोय, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एकूणच राजकारण करता करता अंधेरीतील उमेदवारी हा शिंदे गटासाठी डोकेदुखीच ठरल्याचं दिसून येतंय.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.