AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Sawant : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणं पुण्यकर्म? चार महिने थांबे चित्र स्पष्ट होईल, अरविंद सावंतांचा इशारा

चार महिने थांबा चित्र स्पष्ट होईल, असा थेट इशाराच अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने खोचक सवाल ही केला आहे.

Arvind Sawant : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणं पुण्यकर्म? चार महिने थांबे चित्र स्पष्ट होईल, अरविंद सावंतांचा इशारा
खा. अरविंद सावंतImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 21, 2022 | 5:45 PM
Share

नवी दिल्ली : आधी ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) सत्तेत असताना भाजपकडून वारंवार सरकार पडण्याचे संकेत दिल्या जायचे. तसेच रोज नव्या तारखाही दिल्या जायच्या. मात्र ही तारीख खरी ठरायला अडीच वर्ष उलटली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानेच हे सरकार पडलं आणि राज्यात नवे सरकार अस्तित्वात आलं. मात्र आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या नव्या सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे पुन्हा तीच स्थिती तयार होणार का असा सवाल राजकीय चर्चा वर्तुळात विचारला जाऊ लागलाय. चार महिने थांबा चित्र स्पष्ट होईल, असा थेट इशाराच अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने खोचक सवाल ही केला आहे.

उद्धव ठाकरेंना हटवणं पुण्यकर्म होतं?

अरविंद सावंत हे नव्या सरकार बद्दल बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं आहे. मात्र त्याला आता जनता कंटाळली आहे. उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवलं हे पुण्य कर्म आहे का? असा थेट सवाल अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच बाळासाहेबांचा विचार हा सांगण्यासाठी आहे, आचरणात आणला जात नाही. असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे. तर दुसरीकडे चार महिने थांबा आता चार महिन्यात चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत त्यांनी पुढचे राजकीय संकेत ही दिले आहेत. असेच इशारे ठाकरे सरकारला भाजपकडून दिले जात होते. आता अरविंद सावंत यांचा हा इशारा किती खरा ठरणार हेही येणारे चार महिने सांगतीलच.

शिवसेना विधेयकाला विरोध करणार

तर दुसरीकडे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्लीतल्या या अधिवेशनात तुफान राजकीय घमासान सुरू आहे. संसदेत बँकांच्या खाजगीकरणाचे विधेयक आणले जाणार का? असा सवाल अरविंद सावंत यांना विचारला गेला. यावेळी शिवसेनेचे खासदार या विधेयकाला विरोध करणार असे अरविंद सावंत यांनी बजावले. तसेच ज्या बँका सर्वसामान्यांसाठी लाभ करून देतात त्यांचे खाजगीकरण कशासाठी? असा सवाल ही अरविंद सावंत यांनी मोदी सरकारला केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप याच मुद्द्यावरून आमने सामने येताना दिसून येत आहे. त्यामुळे संसदेचं अधिवेशन हे वादळी ठरणार आहे.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....