AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election : आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचा

अग्निवीर योजना, वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या, एमएसपी, बेरोजगारी, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, देशातील वाढता तणाव, नुपूर शर्मा, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करणार आहे.

Assembly Election : आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचा
आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचाImage Credit source: social media
| Updated on: Jul 18, 2022 | 6:03 AM
Share

नवी दिल्ली : आजपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन (Assembly Election) हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य संसद भवन संकुलात नवीन राष्ट्रपतींसाठी मतदान करतील. लोकसभेच्या सचिवालयाने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार संसदेच्या स्थायी समित्यांनी विचारात घेतलेल्या चार विधेयकांव्यतिरिक्त सरकार अधिवेशनादरम्यान 24 नवीन विधेयके सादर करणार आहे. अधिवेशनादरम्यान भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022 पुन्हा सादर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी हे विधेयक 1 एप्रिल 2022 रोजी सादर करण्यात आले होते. तसेच या अधिवेशनात काही मुद्दे गााजण्याची शक्यात आहे. त्यात अग्निवीर योजना, वाढती महागाई (Inflation) आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या, एमएसपी, बेरोजगारी, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, देशातील वाढता तणाव, नुपूर शर्मा, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करणार आहे. 18 जुलैपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

  1. महागाई : देशात वाढलेली महागाई तसेच पेट्रोल डिझेलच्या किमतींचा झालेला भडका यावरून विरोधक भाजपला धारेवर धरण्याचं काम करणार असल्याचा अंदाज या अधिवेशनात वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसात महागाई वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवण्याचे काम विरोधी पक्षांकडून होत आहे, तेच या अधिवेशनात ही दिसण्याची शक्यता आहे.
  2. अग्निपथ योजना : तसेच सैन्य भरतीसाठी आणलेली अग्निपथ योजना आणि त्या अग्निपथ योजनेला झालेला कडाडून विरोध, देशभरात झालेली हिंसक आंदोलनं, त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी योजना मागे घेण्याची केलेली मागणी, हे सर्व मुद्दे अधिवेशनात चांगलेच गाजताना पाहायला मिळणार आहेत.
  3. रुपयाची घसरण : तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया हा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही गगनाला भिडू लागलेल्या आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे, यावरही अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
  4. शेतकऱ्यांच्या समस्या : तसेच या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्नही मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे. एमएसपी बाबत ही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  5. बेरोजगारी : या अधिवेशनात आणखी एक मुद्दा नक्की गाजणार म्हणजे तो म्हणजे देशातील बेरोजगारीचा, जगाला अडीच वर्ष कोरोनाने तडाखा दिल्यानंतर भारतातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यावर विरोधक आक्रमक होताना दिसून येतील.
  6. चीन सीमाप्रश्न : तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भारत-चीन सीमेचा प्रश्न संसदेत चर्चला येऊ शकतो, भारत-चीन सीमेवर सध्याही तणावाची स्थिती आहे.
  7. वाढणारा तणाव : विविध राजकीय परिस्थितीवरून देशात वाढणार तणाव यावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते. यावरून विरोधी पक्ष भाजपला आक्रमक उत्तर देताना दिसून येतील.
  8. तसेच गेल्या अनेक दिवसात नुपूर शर्मा प्रकरण देशभरात गाजत आहे. यावरून देशाला माफी मागायला लागली अशी टीका काँग्रेसकडून वारंवार होत आहे. तसेच मुस्लिम धर्मियांनी नपूर शर्मा विरोधात देशभरात आंदोलन केली आहेत. हेही प्रकरण संसदेच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतं.
  9. असंसदीय शब्द : या अधिवेशनात काही असनसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र ते शब्द कोणते असावे, यावरून विरोधक सत्ताधारी यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो.
  10. आंदोलनांना बंदी : तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी खासदारांना संसद परिसरात आंदोलनं करता येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाचा हक्क तुम्ही कसे नाकारू शकता? यावरूनही वाद होऊ शकतो.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.