AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का?, थोरातांचा विखेंवर अप्रत्यक्ष निशाणा

सत्ता बदलली की मारली उडी असं राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला.

घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का?, थोरातांचा विखेंवर अप्रत्यक्ष निशाणा
| Updated on: Sep 07, 2019 | 6:37 PM
Share

अहमदनगर : सत्ता बदलली की मारली उडी असं राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला.

आज संगमनेरमध्ये आयोजित महिला मेळाव्यात बोलताना थोरातांनी (Balasaheb Thorat)  पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तर आज भाऊसाहेब कांबळेंनी ही शिवबंधन बांधलं. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता हल्ला चढवला.

राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. सत्ता बदलली की मारली उडी. घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला. मी भक्कम पाय रोवून उभा आहे, म्हणूनच सोनिया गांधींनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली. आता फक्त संगमनेरची जबाबदारी तुम्ही सांभाळा, मी राज्य सांभाळतो, असं भावनिक आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं.

संगमनेर तालुक्यातील महिलांचा मेळावा आज पार पडला. दूध संघाच्या प्रांगणात झालेल्या या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दूध उत्पादक महिलांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, माझा मतदातसंघ आता तुम्हीच सांभाळा असं आवाहन त्यांनी महिलांना केलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.