AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंजारा समाजाकडून आणखी एका नेत्याच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरु, संजय राठोडांनंतर आता या नेत्यालाही मंत्रिपद मिळणार?

शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा काडून मंत्रिपद द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाकडून आणखी एका नेत्याच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरु, संजय राठोडांनंतर आता या नेत्यालाही मंत्रिपद मिळणार?
आणखी एका मंत्रीपदासाठी प्रयत्न Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 11:27 PM
Share

वसई- संजय राठोड (Sanjay Rathod)यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आता आणखी एका बंजारा समाजाच्या (Banjara community)आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आमदार निलय नाईक (Nilay Naik)यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी बंजारा समाजाची मागणी आहे.

यासाठी बंजारा समाजाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी संत सेवालाल बंजारा चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, बंजारा समाज मुख्य समन्वयक सी के पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

रविवारी आमदार निलय नाईक यांनी वसईतील देवीपाडा येथील तांड्यावर येऊन जगदंबा माता आणि संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंजारा समाजाशी सवांद साधला. समाजाचा विकास करण्याची संधी मिळाली, तर निलय नाईक हे नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गाव, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संजय राठोड यांच्यानंतर आता आमदार निलय नाईक यांनाही भाजपाच्या कोट्यातून मंत्रिपद मिळावे यासाठी बंजारा समाजाकडून प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राठोडांना शिंदे गटाकडून मंत्रिपद

संजय राठोड हे शिवसेनेत मंत्रीपदावर होते, त्यानंतर आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाा दिला होता. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी 5 एप्रिल 2021 रोजी वसईतील याच देवीपाडा तांड्यावरून आपल्या जनसंपर्क दौऱ्याची सुरवात केली होती. शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा काडून मंत्रिपद द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी

कोण आहेत आमदार निलंय नाईक?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे भाऊ मधुकरराव नाईक यांचे निलय नाईक हे पुत्र आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद याठिकाणचे ते रहिवासी असून, भाजपाच्या कोट्यातून ते विधानपरिषद आमदार आहेत. निलय नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विधानपरिषदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्वच्छ प्रतिमा असणारा चेहरा म्हणून बंजारा समाज आमदार निलय नाईक यांच्याकडे पहातो. संजय राठोड शिंदे गटाकडून तर निलंय नाईक यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळाले तर बंजारा समाजाच्या दोन मंत्र्यांकडून समाजाचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षाही बंजारा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.