AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंजारा समाजाकडून आणखी एका नेत्याच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरु, संजय राठोडांनंतर आता या नेत्यालाही मंत्रिपद मिळणार?

शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा काडून मंत्रिपद द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाकडून आणखी एका नेत्याच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरु, संजय राठोडांनंतर आता या नेत्यालाही मंत्रिपद मिळणार?
आणखी एका मंत्रीपदासाठी प्रयत्न Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 11:27 PM
Share

वसई- संजय राठोड (Sanjay Rathod)यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आता आणखी एका बंजारा समाजाच्या (Banjara community)आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आमदार निलय नाईक (Nilay Naik)यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी बंजारा समाजाची मागणी आहे.

यासाठी बंजारा समाजाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी संत सेवालाल बंजारा चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, बंजारा समाज मुख्य समन्वयक सी के पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

रविवारी आमदार निलय नाईक यांनी वसईतील देवीपाडा येथील तांड्यावर येऊन जगदंबा माता आणि संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंजारा समाजाशी सवांद साधला. समाजाचा विकास करण्याची संधी मिळाली, तर निलय नाईक हे नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गाव, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संजय राठोड यांच्यानंतर आता आमदार निलय नाईक यांनाही भाजपाच्या कोट्यातून मंत्रिपद मिळावे यासाठी बंजारा समाजाकडून प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राठोडांना शिंदे गटाकडून मंत्रिपद

संजय राठोड हे शिवसेनेत मंत्रीपदावर होते, त्यानंतर आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाा दिला होता. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी 5 एप्रिल 2021 रोजी वसईतील याच देवीपाडा तांड्यावरून आपल्या जनसंपर्क दौऱ्याची सुरवात केली होती. शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा काडून मंत्रिपद द्यावे अशी बंजारा समाजाची मागणी

कोण आहेत आमदार निलंय नाईक?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे भाऊ मधुकरराव नाईक यांचे निलय नाईक हे पुत्र आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद याठिकाणचे ते रहिवासी असून, भाजपाच्या कोट्यातून ते विधानपरिषद आमदार आहेत. निलय नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विधानपरिषदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्वच्छ प्रतिमा असणारा चेहरा म्हणून बंजारा समाज आमदार निलय नाईक यांच्याकडे पहातो. संजय राठोड शिंदे गटाकडून तर निलंय नाईक यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळाले तर बंजारा समाजाच्या दोन मंत्र्यांकडून समाजाचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षाही बंजारा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...