AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेच्या कामांना नाकारले; जनतेने तुम्हाला नाकारले एवढं सोप्प गणित आहे, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला टोला

'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर' अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. 

जनतेच्या कामांना नाकारले; जनतेने तुम्हाला नाकारले एवढं सोप्प गणित आहे, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला टोला
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 11, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते वरून सरदेसाई (Varunu Sardesai) यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर असेल असंही त्यांनी म्हटलं. कोणी कितीही प्रयत्न करा मुंबईकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहातील असं सरदेसाई म्हणाले होते. सरदेसाई यांच्या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत वरून सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर’ अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

वरून सरदेसाईंवर निशाणा

प्रसाद लाड यांनी वरून सरदेसाई आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली!’- वरुण सरदेसाई, हे म्हणजे अस झाल -“गिरे तो भी टांग उपर” तुम्ही जनतेच्या कामांना नाकारले, जनतेने तुम्हाला नाकारले! एवढं सोप्प गणित असताना, स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार आता तरी सोडा!’ असं ट्विट  प्रसाद लाड यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हटलं होत सरदेसाई यांनी?

वरून सरदेसाई यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात शिंदे गट आणि भाजपावर जोरदा टीके केली होती. तसेच त्यांनी मनसे आणि शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर देखील भाष्य केलं होतं. शिवसेनेने गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक वादळे पेलली आहेत. त्यामुळे तीन काय तीस पक्ष जरी एकत्र आले तर काहीही फरक पडणार नाही असं सरदेसाई यांनी म्हटलं होतं. आता लाड यांनी सरदेसाई यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय.

कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.