AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्यानंतर कर्डिलेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, शिवाजी कर्डिले म्हणतात…

एकनाथ खडसेंनंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती. यावर आता स्वतः शिवाजी कर्डिले यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्यानंतर कर्डिलेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, शिवाजी कर्डिले म्हणतात...
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 03, 2020 | 8:38 PM
Share

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगरमधील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला. यानंतर एकनाथ खडसेंनंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती. यावर आता स्वतः शिवाजी कर्डिले यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. “मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही आणि त्याची मला गरजही नाही,” असं म्हणत शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राष्ट्रावादी प्रवेशाची चर्चा फेटाळली आहे (BJP Leader Shivaji Kardile comment on gossips of his NCP joining in Ahmednagar).

शिवाजी कर्डिले म्हणाले, “राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी येणार असल्याचा दावा केला. मात्र तनपुरे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही आणि त्याची मला गरजही नाही.”

मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं तेव्हा माझ्यासाठी खडसे नगरमध्ये आलेले : शिवाजी कर्डिले

“एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात असताना ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी माझ्यावर एक संकट आलं होतं. त्यावेळी मला एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले होते. तेव्हा माझ्यावरील अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी एकनाथ खडसे नगरमध्ये आले होते. त्यामुळे त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. असं असल्यानेच लोक माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा करत असतील. मात्र ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपलाय,” असंही शिवाजी कर्डीले यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, कर्डिलेंचा दावा

महाविकास आघाडीचे सरकार डिसेंबरपर्यंत, तर डिसेंबरनंतर राज्यात भाजप सरकार येईल, असा दावा माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केलाय. ते म्हणाले, “आता पुढचे 5 वर्षे तर सोडून द्या, हे 5 वर्षे देखील सरकार टिकेल की नाही हे महाराष्ट्रातील जनताच सांगेल. त्यामुळे त्याला कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे महाविकासआघाडीची सत्ता डिसेंबरपर्यंत टिकेल आणि डिसेंबर नंतर राज्यात भाजप सरकार येईल.”

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या ‘किंगमेकर’चा दावा

विखेंवर कारवाई होईपर्यंत आमची नाराजी कायम : शिवाजी कर्डिले

नगरमधील पराभवाला विखे जबाबदार, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा आरोप

BJP Leader Shivaji Kardile comment on gossips of his NCP joining in Ahmednagar

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...