पुणे : संजय राऊत (Sanjay Raut) कायमच चालू घडामोडींवर प्रतिक्रिया देत असतात. आज अशीच प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी (Media) बोलताना दिली आहे. देशात जी परिस्थिती सुरू आहे त्या वरून संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत असताना टोला लगावला आहे. माध्यमातील पत्रकारांनी राणा दामपत्याला वागणूक मिळाली त्यावर क्रिरिट सोमय्यांनी केलेल्या विधानां बद्दल संजय राऊत यांना विचारले असता संयज राऊत यांनी सध्या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे. त्यापेक्षा इंग्रजांची राजवट बरी असा टोल शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. देशात जे काही सुरू आहे ते पाहिल्यावर इंग्रज बरे होते असं वाटतं असं ही संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.