AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा

"पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील," असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा
| Updated on: Nov 20, 2020 | 11:45 PM
Share

सातारा :पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील,” असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरु आहेत. सर्व पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जयंत पाटीलदेखील पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यात होते. यावेळी जयंत पाटील यांनी हा दावा केला. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी तयारीच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत बोलताना महाविकास दोन्हीही उमेदवार 40 ते 50 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपमुळे राज्यातील वीजवितरण गोत्यात

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी वीजबील न भरण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना “भाजप सरकारच्या मागील 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी 67 हजार कोटीपर्यंत गेली,” असा  आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. यामुळेच वीजवितरण व्यवस्था गोत्यात आली आहे, असे पाटील म्हणाले. तसेच, महावितरणची अवस्था अशी का झाली?, याची खातरजमा होण्याची गरज आहे. काल झालेल्या बैठकीत वीजबिलाबाबत कोणत्या पद्धतीच्या सवलती देता येतील यावर चर्चा झाली. यावर सध्या काम चालू आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.

महावितरण कंपनी 11 महिन्यांत तोट्यात कशी?

महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तिन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

संबंधित बातम्या :

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...