AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा

"पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील," असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा
| Updated on: Nov 20, 2020 | 11:45 PM
Share

सातारा :पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील,” असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरु आहेत. सर्व पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जयंत पाटीलदेखील पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यात होते. यावेळी जयंत पाटील यांनी हा दावा केला. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी तयारीच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत बोलताना महाविकास दोन्हीही उमेदवार 40 ते 50 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपमुळे राज्यातील वीजवितरण गोत्यात

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी वीजबील न भरण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना “भाजप सरकारच्या मागील 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी 67 हजार कोटीपर्यंत गेली,” असा  आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. यामुळेच वीजवितरण व्यवस्था गोत्यात आली आहे, असे पाटील म्हणाले. तसेच, महावितरणची अवस्था अशी का झाली?, याची खातरजमा होण्याची गरज आहे. काल झालेल्या बैठकीत वीजबिलाबाबत कोणत्या पद्धतीच्या सवलती देता येतील यावर चर्चा झाली. यावर सध्या काम चालू आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.

महावितरण कंपनी 11 महिन्यांत तोट्यात कशी?

महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तिन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

संबंधित बातम्या :

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…