AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा

"पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील," असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा
| Updated on: Nov 20, 2020 | 11:45 PM
Share

सातारा :पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील,” असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरु आहेत. सर्व पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जयंत पाटीलदेखील पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यात होते. यावेळी जयंत पाटील यांनी हा दावा केला. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी तयारीच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत बोलताना महाविकास दोन्हीही उमेदवार 40 ते 50 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपमुळे राज्यातील वीजवितरण गोत्यात

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी वीजबील न भरण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना “भाजप सरकारच्या मागील 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी 67 हजार कोटीपर्यंत गेली,” असा  आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. यामुळेच वीजवितरण व्यवस्था गोत्यात आली आहे, असे पाटील म्हणाले. तसेच, महावितरणची अवस्था अशी का झाली?, याची खातरजमा होण्याची गरज आहे. काल झालेल्या बैठकीत वीजबिलाबाबत कोणत्या पद्धतीच्या सवलती देता येतील यावर चर्चा झाली. यावर सध्या काम चालू आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.

महावितरण कंपनी 11 महिन्यांत तोट्यात कशी?

महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तिन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

संबंधित बातम्या :

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.