AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम, निर्बंधावरून पुन्हा पाटलांची मुख्यमंत्र्यांना टोलेबाजी

चंद्रकांत पाटलांनी राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असे म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत.

राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम, निर्बंधावरून पुन्हा पाटलांची मुख्यमंत्र्यांना टोलेबाजी
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 7:43 PM
Share

राज्यात लावलेल्या निर्बंधावर भाजप नेते सतत टीका करत आहेत, तसेच मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, यावरूनही चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असे म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाहीये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. निर्बंधाच्या घोळामुळे एक आत्महत्या नाही तर अनेक आत्महत्या झाल्या, भयानक सुरू आहे सर्व,मुंबई पालिका आयुक्त चहल खरं बोलतायत का उद्धव ठाकरे ? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

काही तासांपूर्वीच चंद्रकांत पाटलांचे ट्विट

सततच्या लॉकडाऊनच्या जाचाला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी कळली. शिथिल न झालेले निर्बंध आणि नोकरी गमावून बसल्यामुळे तरुणांना आपलं आयुष्य संपवावं लागत आहे. मात्र सरकारने निर्बंधांचा कळस गाठला असून नागरिकांचा गळा घोटणं सुरूच ठेवलं आहे. मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. अशी टीका त्यांनी ट्विट करत केली होती.

पटलांना राजे टोपेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी जान है तो जहान है, असे बोलतात, त्यामुळे जीव आहे, सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे असे टोपे म्हणाले आहेत. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं.

‘जान है तो जहान है’, राजेश टोपेंनी चंद्रकांतदादांना मोदींच्या वक्तव्याची करुन दिली आठवण! कारण काय?

पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही, प्रश्न सोडवायचाय, भाजपची पहिली प्रतिक्रिया काय?

गोवा भाजपला गळती सुरूच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांटेंचा राजीनामा, आतापर्यंत चार जणांनी सोडला पक्ष

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.