AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन जाधव हे **** आहेत, चंद्रकांत खैरे यांची जहरी टीका

औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव हे **** आहेत, चंद्रकांत खैरे यांची जहरी टीका
| Edited By: | Updated on: Oct 16, 2019 | 8:53 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे. हर्षवर्धन जाधव हे नीच आहेत, असं म्हणत खैरे यांनी जाधव यांना लक्ष्य केलं. नुकतेच हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर संताप व्यक्त केला होता. मात्र या टीकेला उत्तर देताना खैरेंनीही अर्वाच्य भाषेत जाधव यांच्यावर टीका (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) केली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “हर्षवर्धन जाधव यांनी भगवा झेंडा खाली खेचला आणि त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला, मग उद्धव ठाकरे काय चुकीचं म्हटले. एमआयएमसोबत मैत्री करुन हर्षवर्धन यांनी शिवसेनेला हरवण्याचे काम केले. हा किती नीच आहे. हे इथल्या मतदारांना माहिती नव्हते. आता त्यांना माहित पडले असेल.”

“हर्षवर्धन यांनी घरातही आई, भावाला आणि बायकोला मारहाण केली आहे. वडिलांनाही त्याने बैठकीत सर्वांसमोर मारले होते. हे असे चाळे करणारे काही उपयोगाचे नाही. याला खरतर वेड्याच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे”, असंही खैरे म्हणाले.

“जाधवांनी जे वक्तव्य केलं आहे ना त्यामुळे जनता चिडलेली आहे. तसेच शिवसैनिकही चिडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहे. त्याला निवडणुकीतूनही बाद केले पाहिजे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आर्वाच्य भाषेत टीका केल्यामुळे राज्यातून शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाने हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी अशी तक्रारही राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये सध्या दाखल केली जात आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“जर आपली लोकं शिवसेनेची असतील, भाजपची असतील, चुका झाल्या तर कान खेचा, मीही त्यांचे कान उपटल्याशिवाय राहणार नाही. मी कन्नडमध्ये सभेला गेलो होतो. तेथेही मी हेच बोललो. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती. त्याला आता अजिबात माफ करणार नाही. चुकतोय, लहान आहे म्हणून मी गेल्या 5 वर्षे त्याच्या चुका पोटात घालत होतो. पण भगव्याशी हरामखोरी मी सहन करु शकत नाही”, असे उद्धव ठाकरें हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल बोलले होते.

काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव ?

“जर मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? अब्दुल सत्तार तुमचा पाहुणा आहे का?” असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.