AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, छगन भुजबळ संतापले; कारवाईची मागणी

भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही.

मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, छगन भुजबळ संतापले; कारवाईची मागणी
sambhaji bhideImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2023 | 2:46 PM
Share

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 30 जुलै 2023 : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यावरून राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली आहेत. आता या वादात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

छगन भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. खरे म्हणजे तो मनोहर भिडे. त्याच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. मला कधी कधी वाटतं त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही. त्या मनोहर भिड्यांचं, असं छगन भुजबळ म्हणाले.

अशा लोकांवर कडक कारवाई करा

महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शाह असतील कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

त्यांच्यासोबत जाणं आत्मघातकी

भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही. मोदी आणि शाहही सहन करणार नाही. भिडेंवर कारवाई कडक होत नाही म्हणून ते वाट्टेल ते रोज रोज नवीन नवीन काही तरी बोलतात, असं त्यांनी सांगितलं.

स्तुती नको, पण टीका तरी का?

आता पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरुंचं देशासाठी काडीचंही योगदान नाही असं म्हणतात. अरे त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सर्व दिलं त्यांनी या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. स्वत: साडे अकरा वर्ष नेहरु तुरंगात राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे तेव्हा माहीत नव्हतं.

ते असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस, लाला लजतपराय असतील, टिळक असतील ही सर्व मंडळी लढत होती. त्यावेळी ते देशासाठी लढले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल. फार फार त्यांची भलामण करू नका. त्यांची स्तुती करू नका. पण असले काही तरी आरोप करू नका. मला तरी ते आवडत नाही आणि पसंत नाही, असं भुजबळ म्हणाले.

चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले.
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.