AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केलीये. तसेच केंद्र सरकारच्या मदतीवरून खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय.

हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 7:33 AM
Share

अहमदनगर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केलीये. तसेच केंद्र सरकारच्या मदतीवरून खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळून गेले. त्यामुळे हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री अशी घणाघाती टीका वाघ यांनी केली. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज (24 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिथे पोहोचले. त्यामुळे त्यांचं अभिनंदन, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. सर्वात आधी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन पाहणी केली. कामांमध्ये लक्ष घालून लोकांना मदत करायला सरकारला भाग पाडलं, असंही मत वाघ यांनी व्यक्त केलं.

“ड्रायव्हिंग स्किल कोकणात दाखवण्याची गरज”

चित्रा वाघ म्हणाल्या, “मुख्यमंत्री मातोश्रीवरून पंढरपूरला ड्रायव्हिंग स्किल दाखवत गेले. ते ड्रायव्हिंग स्किल कोकणात दाखवण्याची गरज होती. कारण लोकं तिथे चातकासारखी सरकारच्या प्रतीक्षेत बसली होती. सरकारची मदत तिथे जाणे अपेक्षित होती मात्र मदत पोहोचली नाही.” यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीवरून खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीये. राज्याचे सर्वज्ञानी जे गुरु आहे ते नेहमी म्हणतात केंद्राने मदत करायला पाहिजे. केंद्र मदत करणारच, पण राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही? असा सवाल त्यांनी राऊत यांना केलाय. राज्य सरकार म्हणून आपले दायित्व आहे ते संजयजी आपल्याला निवभवायला पाहिजे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

“हे कसले पालकमंत्री, हे तर पळकुटे मंत्री”

“रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळून गेलेय. त्यामुळे हे कसले पालकमंत्री, हे तर पळकुटे मंत्री आहे. रत्नागिरीच्या नागरिकांचे प्राण कंठाशी आले असताना त्या ठिकाणी तळ ठोकून बसायला हवं होतं. मात्र, हे पळून आलेले मंत्री आहेत. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे,” असं वाघ म्हणाल्या. “महाविकास आघाडीमध्ये एकी नसून हे रोज स्वार्थासाठी भांडत आहे. दररोज आमचे सरकार पाच वर्षे टिकेल अस सांगताय. मात्र यांना कोणी विचारलं. जर सरकार 5 वर्षे टिकणार आहे, तर दररोज सांगायची गरज नाही,” असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिलाय.

हेही वाचा :

‘..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ, मुलीशी अश्लील भाषेत बातचित, पीडितेच्या न्यायासाठी चित्रा वाघ कडाडल्या

व्हिडीओ पाहा :

Chitra Wagh criticize Anil Parab and MVA government over flood help in Maharashtra

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.