AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश नाईकांवर अनेक दिवसांपासून डोळा होता, अखेर योग आला : मुख्यमंत्री

या भागातील भाजपचा चेहरा गणेश नाईक (Ganesh Naik in BJP) असणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय पनवेल महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे, आता नवी मुंबई महापालिकाही भाजपच्याच ताब्यात येईल, त्यानंतर नवी मुंबईचा वेगाने विकास होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

गणेश नाईकांवर अनेक दिवसांपासून डोळा होता, अखेर योग आला : मुख्यमंत्री
| Updated on: Sep 13, 2019 | 11:32 AM
Share

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik in BJP) यांनी अखेर 48 नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई आणि पालघरचे प्रश्न गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोडवले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे या भागातील भाजपचा चेहरा गणेश नाईक (Ganesh Naik in BJP) असणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय पनवेल महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे, आता नवी मुंबई महापालिकाही भाजपच्याच ताब्यात येईल, त्यानंतर नवी मुंबईचा वेगाने विकास होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून गणेश नाईकांचं स्वागत

कर्तृत्ववान क्षमतेचं नेतृत्त्व गणेश नाईक यांच्यावर आमचा अनेक दिवसांपासून डोळा होता, असं मिश्कील वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. भाजप हा परिवार असून आम्ही परिवाराचा विस्तार करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची प्रगती होत असल्याचा विश्वास प्राप्त झाल्यामुळे नेते भाजपात येत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेत चांगलं काम केलं आहे, त्याला आता राज्य सरकारचं इंजिन जोडलं जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्राचं चित्र बदललं जाईल. मेट्रोपॉलिटियन क्षेत्रात कुठेही एक तासात जाता आलं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. नवी मुंबईतून कुठेही एक तासात जाता येईल, असं जाळं तयार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाईक साहेब आपण आला आहात, आता आपल्या नेतृत्वात भूमीपुत्रांचे प्रश्न सोडवू. जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावू. नाईक साहेबांच्या येण्यामुळे भाजपला पाठबळ मिळालं आहे. मुंबई, पालघर, ठाणे या भागात नाईक साहेबांना मानणारा वर्ग आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गणेश नाईकांकडूनही मोदी सरकारचं कौतुक

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या गणेश नाईकांनी यावेळी मोदी सरकारचं कौतुक केलं. देश प्रगती करत असून ही प्रगती सुसाट वेगाने होत आहे. देशाला अनेक पंतप्रधान लाभले, पण देशाच्या बाहेरही शक्तीमान होण्यासाठी मोदींसारख्या नेत्याची गरज होती, असंही गणेश नाईक म्हणाले.

समान नागरी कायदा देशाची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवले, धाडसाने निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी अमित शाहांच्या कामाचंही कौतुक केलं.

“15 वर्षात मला प्रश्न सोडवता न आल्याची खंत”

गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी सर्व वंचित घटकांना सामाजिक, आर्थिक न्याय दिला. शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रात मंदी अली असताना मुख्यमंत्र्यांनी चांगलं राज्य चालवलं. ज्या नवी मुंबईत मी जन्मलो, वाढलो, मला यश नवी मुंबतील नागरिकांनी दिलं म्हणून प्रगती झाली. मी 15 वर्ष मंत्री होतो, पण माझी खंत आहे, त्यात मी लोकांना न्याय देऊ शकलो नाही, असंही गणेश नाईक म्हणाले.

दरम्यान, गणेश नाईक यांच्या एकेकाळच्या कट्टर विरोधक भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा भाजपची ताकद वाढणार असल्याचं सांगितलं आणि गणेश नाईकांचं पक्षात स्वागत केलं.

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.