AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात…

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  सांगितलं.

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात...
| Updated on: Dec 21, 2019 | 8:58 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा (farmer loan waiver aaditya thackeray comment)  केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कोणतेही हेलपाटे न घालता किंवा कोणतीही अट न घालता ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस सरकारवर खरपूस टीका केली.

“महाविकासआघाडीने केलेल्या कर्जमाफीवर बोलण्याचा विरोधी पक्षाला कोणताही अधिकार नाही. नोटाबंदीनंतर काळा पैसा परत येईल, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात देऊ आणि यानंतर सांगतात की हा सर्व जुमला आहे. असे खोटारडेपणाचे ढोंग घेऊन फिरतात. लोकांशी ते खोट बोलतात जुमला करतात. या लोकांना कोणावरही बोलण्याचा अधिकार नाही.” अशी टीका आदित्य ठाकरेंनी (farmer loan waiver aaditya thackeray comment)  केली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पीक कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन थाळी अशा घोषणा केल्या. तसेच विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण घोषणा केली. एक नवीन आमदार म्हणून हे सर्व बघायला मिळणे याला भाग्य लागते.” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा अनुभव नक्की चांगला होता. जे विषय मांडले गेले. ते खूप विषय पटलावर घेतले आहेत. मी गेले दहा वर्षे या ठिकाणी येतो. मात्र सभागृहात बसणं, एखाद्या विषयावर चर्चा करणे त्यात सहभागी होणे हा वेगळा अनुभव असतो,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“आजची कर्जमाफी ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. राज्यातील 90 ते 95 टक्के शेतकरी यात समाविष्ट आहेत. 2 लाखापर्यंत जे शेतकऱ्यांचे कर्जमाफीची घोषणा फार मोठी आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीची आणि दहा रुपयांत थाळीची घोषणा झाली आहे. असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी (farmer loan waiver aaditya thackeray comment)  स्पष्ट केले.”

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.