AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे पृथ्वीबाबा, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं, एकाचवेळी 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली आहे.

जे पृथ्वीबाबा, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं, एकाचवेळी 300 'पॉवरफुल्ल' अधिकाऱ्यांना झटका
cm-uddhav-thackeray-with-mantralay-photo
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 9:47 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

पृथ्वीराज चव्हाण, फडणवीसांचे प्रयत्न अयशस्वी

यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात ते यशस्वी झाले नव्हते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

सचिवांपेक्षा अधिकारी पॉवरफुल्ल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एकाच कक्षात वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी ‘पॉवरफुल्ल’ बनले होते. कोणताही कॅबिनेट सदस्या त्यांचं काही ‘वाकडं’ करु शकत नव्हता. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मग विचारमंथन करुन, या 300 अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली”

आम्हाला आशा आहे की गेल्या दोन दिवसात जारी केलेले सर्व हस्तांतरण आणि पदोन्नती आदेश लागू केले जातील. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागासाठी ही खरी कसोटीची वेळ असेल, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

संबंधित बातम्या 

12 आमदार नियुक्ती वाद, राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?  

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयची अटक, तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.