AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ आश्वासन कोणते जे हवेतच विरले, अंबादास दानवेंनी करुन दिली आठवण

सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते, पीक पाहणी करुन ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटणार होते. शेतकरी कुटुंबियांची स्थिती पाहून त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली.

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांचे 'ते' आश्वासन कोणते जे हवेतच विरले, अंबादास दानवेंनी करुन दिली आठवण
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 2:55 PM
Share

यवतमाळ : यंदा (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला त्रासून (Farmer Suicide) शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील जनतेला काय आश्वासन दिले होते, याची आठवण आता विरोधक करुन देत आहेत. हे राज्य कष्टकरी, शेतकरी आणि मजूरांचे असून भविष्यात महाराष्ट्र हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी यंत्रणा राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. पण गेल्या तीन महिन्यातही आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. सर्वाधिक आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या भागात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते, पीक पाहणी करुन ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटणार होते. शेतकरी कुटुंबियांची स्थिती पाहून त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली.

शेतकरी हिताच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. पोखरा सारख्या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असून हे सरकारचे अपयशी असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणेही गरजचे आहे.

रामदास कदम यांचे राजकीय जीवन हे शिवसेनेमुळेच घडले आहेत. पण आता त्यांना त्या गोष्टींचा विसर पडला आहे. सर्वकाही शिवसेनेमुळेच मिळाल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. पण सध्या ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत आहेत ते अशोभनीय असल्याचेही दानवेंनी सांगितले.

ते 40 गद्दार म्हणजेच शिवसेना नाही. हा पक्ष मर्दांचा असून आजही सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. त्या आमदारांनी दिलेला धोका महाराष्ट्रातील जनता कधीही विसरु शकणार नाही. तर शिवसेना हा जात, पात न मानणारा पक्ष असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.