AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका, तर…”, राहुल गांधी महाराष्ट्रात येताच आक्रमक

या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला.

फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका, तर..., राहुल गांधी महाराष्ट्रात येताच आक्रमक
| Updated on: Sep 05, 2024 | 3:26 PM
Share

Rahul Gandhi Attack On PM Narendra Modi : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधींनीही यावरुन भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेप्रकरणी जाहीरपणे माफी मागितली होती. त्यावरुन आता राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली.

“…म्हणून पंतप्रधान मोदींनी माफी मागितली”

गेल्या साठ वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनीस कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली, असे राहुल गांधी म्हणाले.

“फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नका…”

शिवाजी महारांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. पुढे ५० वर्षानंतरही हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते. शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता. मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात, अशीही टीका राहुल गांधींनी केली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.