AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणार; ‘या’ कामांसाठी होणार सोशल मीडिया वापर

आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेतले.

शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणार; 'या' कामांसाठी होणार सोशल मीडिया वापर
शिंदे सरकार हायटेक होणार, सोशल मीडियाचा वापर करणारImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Oct 25, 2022 | 11:33 AM
Share

कोल्हापूर: राज्यातील शिंदे सरकारने (shinde camp) आता हायटेक होणार आहे. या सरकारने सोशल मीडियाचा (social media) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जाणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. हे सरकार तुमचंच आहे, असं दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी स्पष्ट केलं.

दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिक्षकांची भरती घेण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. आम्ही जे निर्णय घोषित करतो, त्याची अंमलबजावणी करतो. आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी समाधानाने घरी जावं, असं दीपक केसरकर म्हणाले.

नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं. आम्ही नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारवर लिहून रोष ओढवून घेतला होतं. खऱ्या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले आहे, असं ते म्हणाले.

आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आम्ही आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत बोलत रहायचं पण शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही. बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवतोय. बोलणं आणि करणं यात फरक आहे. बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यातला फरक दिसतोय, असा टोला त्यांनी लगावला.

आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल. आम्ही म्हणजे सर्वस्व हे चालत नाही. बाळासाहेब ठाकरे हे जनतेला आपले वाटायचे, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...