AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून वेदांता राज्याबाहेर गेला; एकनाथ खडसेंचा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

...म्हणून वेदांता राज्याबाहेर गेला; एकनाथ खडसेंचा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2022 | 11:53 AM
Share

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta) प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील उडी घेतली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील उद्योग स्थलांतरीत होता कामा नये, मात्र राज्य सरकारचा दबाव नसल्यानं उद्योगांच स्थालांतर होत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. उद्योगांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं देखील खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेदातांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हटलं एकनाथ खडसे यांनी?

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीका केली आहे. उद्योगांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत कारण सरकारचा दबाव नाही अशी टीका खडसे यांनी केली आहे. राज्यातील उद्योग स्थलांतरीत होता कामा नये असं खडसे यांनी म्हटलं आहे.

वेदांतावरून विरोधक, सत्ताधारी आमने-सामने

सध्या वेदांताचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वेदांता राज्याबाहेर जाण्यास कोण जबाबदार? यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरूनच काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या आंदोलनानंतर भाजपनं देखील याच मुद्द्यावरून आंदोलन केल्याचं पहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांच्याकडे वेदांताबाबत काही कागदपत्रे असतील तर ते त्यांनी उघड करावेत असं आव्हान देखील भाजपाच्या वतीने देण्यात आलं होतं.

जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.