AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ठाण्यापासून औरंगाबाद महापालिकाही हातची जाणार; शिंदेंचं बंड कायम राहिल्यास शिवसेनेचं या जिल्ह्यात होणार पानीपत

राज्यपातळीवर आमदारांची अशा प्रकारे नाराजी उफाळून आल्यानंतर ग्रामीण पातळीवरील पक्षातही उभी फूच पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निव़डणुकांसोबतच अनेक जिल्ह्यांतील अनेक पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत.

Eknath Shinde: ठाण्यापासून औरंगाबाद महापालिकाही हातची जाणार; शिंदेंचं बंड कायम राहिल्यास शिवसेनेचं या जिल्ह्यात होणार पानीपत
| Updated on: Jun 21, 2022 | 6:31 PM
Share

मुंबईः ठाण्यातील ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे अवघा महाराष्ट्र वेठीस धरलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला  (Mahavikas Aghadi) मोठा हादरा बसलाच आहे. सरकार पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. फक्त हाच धक्का नाही तर शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला येत्या काळात अनेक दिवस हे धक्के सहन करावे लागू शकतात. कारण मुंबईसह ठाणे (Thane Municipal Corporation), नाशिक, औरंगाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणी आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांची तर जय्यर तयारी सुरु झाली आहे. पण विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी 30 ते 35 आमदारांच्या पाठिंब्यानं उगारलेलं बंडाचं हत्यार शिवसेनेच्या वर्मी बसणार, असंच दिसतंय. एवढे आमदार शिवसेनेतून फुटण्यापासून वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवले आहेत. महाविकास आघाडी सरकार की आमदार, यापैकी काय वाचवायचं, या धर्मसंकटात शिवसेना सापडली आहे. निश्चित शिवसेनेला अनेक ठिकाणी नमतं घ्यावं लागण्याची शक्यता आहे. पण या घडामोडींमुळे शिवसेनेच्या महाराष्ट्रातील राजकीय अस्तित्वावर संकट उभं राहणार हे नक्की.

शिवसेनेचे अनेक गढ, मनपात काय होणार?

महाविकास आघाडी सरकारला मोठं भगदाड पडल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेविरोधातील नाराजी उफाळून येणार की काय अशी चर्चा आहे. आगामी काळात ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, कुळगाव बदलापूर नगरपरिषद, अंबरनाथ नगरपरिषद, औरंगाबाद अशा प्रमुख ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहे. यापैकी काही तर शिवसेनेचे गड मानले जातात. आज एकनाथ शिंदेंच्या बंडासमोर नमतं घेतलं तर महापालिका निवडणुकांणध्येही शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागणार हेही पहावं लागेल.

ग्रामीण भागातूनही बंडखोरी उफाळणार?

राज्यपातळीवर आमदारांची अशा प्रकारे नाराजी उफाळून आल्यानंतर ग्रामीण पातळीवरील पक्षातही उभी फूच पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निव़डणुकांसोबतच अनेक जिल्ह्यांतील अनेक पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. इथेही पक्षांतर्गत बंडाळी उफाळली तर इथेही शिवसेनेला सत्ता गमावावी लागणार. तसेच सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा, यवतमाळमधील जि.प. न.प मधील सत्तेला नख लागण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.