AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. (gajanan kirtikar)

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल
गजानन किर्तीकर, शिवसेना खासदार
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 3:25 PM
Share

नवी दिल्ली: शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?, अशा शब्दात गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. (gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी गजानन किर्तीकर यांनीही भाजपला घेरलं. केंद्र सरकारने केवळ नोंद घेतली म्हणून ही घटना दुरुस्ती होत आहे. आजारी माणसाला पूर्ण गोळी न देता अर्धीच गोळी देण्यात आली आहे. इंदिरा सहानी प्रकरणी जो निर्णय देण्यात आला होता. त्याला छेद देता आला असता. पण काल त्यावर काहीच निर्णय झाला नाही. परंतु, आमचं जे कर्तव्य होतं त्यानुसार आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे, असं किर्तीकर यांनी सांगितलं.

तोंडाला पाने पुसली

आम्ही कुणाला किती टक्के आरक्षण द्यावं याची मागणी केली नाही. आरक्षणाची जी मर्यादा आहे. त्यामुळे आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. शिवसेना दुटप्पी नाही. भाजपने मराठा आणि ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या विधेयकातून केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो, असं ते म्हणाले.

अधिकार केंद्राकडेच होता

तर, भाजपकडून कालपर्यंत महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात होते. राज्याकडेच आरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झालं आहे. काल आम्हीही दुरुस्ती सूचवली. पण आमच्या दुरुस्तीला भाजप खासदारांनी समर्थन दिलं नाही, असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

भाजप गप्प होती

खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने आणलेलं 102वं घटना दुरुस्ती हे विधेयक अपुरं असल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत, अशी सूचना आम्ही केली होती. आम्ही जी दुरुस्ती सूचवली होती. ती संसदेत मताला टाकली असता काँग्रेससह इतर पक्षांनी तिला पाठिंबा दिला. एकूण 71 खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. पण भाजपने विरोध केला. रावसाहेब दानवे काल तिथे होते. कोणत्याही परिस्थिीत भाजपच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देईल असं सांगणारे दानवे तोंड गप्प करून बसले होते, अशी टीका राऊत यांनी केली. (gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

संबंधित बातम्या:

आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?; विनायक राऊत बरसले

50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याविरोधात भाजपचं मतदान, भाजप आरक्षणविरोधी असल्याचं उघड; राऊतांचा घणाघात

हा तर भिजलेला फटका, तुम्ही खेळ का करताय? थेट 50 टक्क्यांची मर्यादा उठवा, राऊतांचा हल्लाबोल सुरूच

(gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.