AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Gopichand Padalkar : शरद पवारांनी धनगर समाजाच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या, गोपीचंद पडळकरांचा आरोप; पुण्याच्या कौन्सिल हॉलबाहेर ठिय्या

शरद पवारांनी (Sharad Pawar) धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा फायदा घेऊन धनगर समाजाच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Pune Gopichand Padalkar : शरद पवारांनी धनगर समाजाच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या, गोपीचंद पडळकरांचा आरोप; पुण्याच्या कौन्सिल हॉलबाहेर ठिय्या
पुण्याच्या कौन्सिल हॉलबाहेर आंदोलनात सहभागी गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 4:02 PM
Share

पुणे : शरद पवारांनी (Sharad Pawar) धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा फायदा घेऊन धनगर समाजाच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यशवंत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पुण्यातील विधान भवनाबाहेर (Council Hall Pune) ठिय्या मांडला, त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. टीका करताना ते म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेने वाफगावच्या किल्ल्याचा ताबा सोडावा अन्यथा आम्ही तो किल्ला ताब्यात घेणार. पवार जेजुरीत काही संबंध नसताना पुतळ्याच्या उद्घाटनाला गेले, सांगलीत उद्घाटन केले, तसे या वाफगावच्या किल्ल्याबाबत (Fort) का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आम्ही आता चर्चा करणार नाही. वेळ आली की किल्ला ताब्यात घेणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘आम्ही लोकवर्गणीतून विकास करू’

वाफगावचा किल्ला ही पुरातन वास्तू आहे. पुरातन वास्तूचे जतन, संवर्धन करणे राज्या सरकारची जबाबदारी असते. एका किल्ल्यासाठी एक आणि दुसऱ्या किल्ल्यासाठी एक अशी भूमिका घेता येणार नाही. गेली अनेक वर्षे हा किल्ला रयत शिक्षण संस्थेकडे आहे. त्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही. आता या किल्ल्याची पडझड होत आहे. त्यामुळे तो ताब्यात घ्यावा, अन्यथा लोकवर्गणीतून आम्ही त्याचा विकास करू, असा इशारा त्यांनी दिला.

‘अहिल्यादेवीच्या नावाने राजकारण’

अहिल्यादेवीच्या नावाने शरद पवारांना राजकारण करायचे आहे. अहिल्यादेवींचा पुतळा जेजुरीत संस्थानच्या वतीने बसवला, तेथे पवार कुटुंबीयांची नावे होती. वास्तविक याच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा त्यांनी फायदा घेतला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आणखी वाचा :

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Pune Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, चित्रा वाघांचं पुणे पोलिसांना पत्र

Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.