AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही : आरोग्यमंत्री

राज्यातील सर्व धार्मिक स्थळं लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात (Health minister Rajesh Tope On Religious Places) आहे.

धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही : आरोग्यमंत्री
| Updated on: Aug 17, 2020 | 6:44 PM
Share

अहमदनगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. ही धार्मिक स्थळं पुन्हा खुली करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्यातील सर्व धार्मिक स्थळं लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात आहे. मात्र धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंग हे पालन होणार नाही, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. (Health minister Rajesh Tope On Religious Places)

धार्मिक स्थळे सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपे यांनी विचारले असता ते म्हणाले, धार्मिक स्थळ, जिम, विमान सेवा सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र धार्मिक स्थळांमध्ये लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही.

जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिकस्थळ सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगून वेळ लागला तरी हरकत नाही असे राजेश टोपे म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा गुणी आणि चांगला कलावंत होता. मात्र त्याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, असे राजेश टोपे म्हणाले. या प्रकरणी पोलीस त्यांचं काम करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र यात कोणी राजकारण करु नये, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान नुकतंच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी “मंदिर पुन्हा सुरु करावी, अशी विनंती सरकार दरबारी करा,” अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली.

यावेळी राज ठाकरेंनी “धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न विचारला. तसेच त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असेही राज ठाकरेंनी सांगितले. (Health minister Rajesh Tope On Religious Places)

संबंधित बातम्या : 

त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल

Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावली

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत