AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर

जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे,  अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली […]

मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे,  अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली आहे. पण मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली नाही. माझ्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र त्यांचा अजून मला कोणताही निरोप आलेला नाही. त्यामुळे आज किंवा उद्या मी त्यांची भेट घेणार आहे, असं शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असल्याची चर्चा होती. मात्र आपल्या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसून, उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.

खोतकरांकडे समन्वयकाची जबाबदारी

अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठावाडा विभागाच्या समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, खोतकरांच्या जालन्यातील घराबाहेर शिवसैनिकही जमले असून, खोतकरांच्या उमेदावारीसाठी घोषणा दिल्या जात आहेत.

भाजपची संभाव्य 7 उमेदवार

भाजपने पहिल्या यादीतच जालन्यातील उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. आज किंवा उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांचं आव्हान संपुष्टात आले आहे.

दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केली. दानवेंविरोधात खोतकरांनी शड्डू ठोकला होता. दानवेंचा पराभव करणारच, अशा घोषणाही खोतकरांनी जालन्यातील सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या. मात्र, आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

अर्जुन खोतकरांचं बंड थंडावलं, एका पदावर बोळवण  

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती  

शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सभेचं स्थळ आणि तारीख ठरली!  

भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल 

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.