AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं…

मी पक्षाला आई मानतो. कुठून काही तरी मिळतंय म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. माझ्या सुटकेनंतर लोकांना आनंद झाला. ते शिवसैनिक होते. ते सर्व अचानक बाहेर पडले.

तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं...
तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं... Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 2:43 PM
Share

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्बल 102 दिवसानंतर तुरुंगातून सुटले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण आपल्याला अटक होणार हे राऊत यांना आधीच माहीत होतं. त्याचं सुतोवाच त्यांनी वेळोवेळीही केलं आहे. पण राऊत यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटली नाही का? त्यांना तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली? असा सवाल निर्माण झाला आहे. त्याचं उत्तर खुद्द राऊत यांनीच दिलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

मी तुरुंगात गेलो. मला खात्री होती. उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या हिंमतीवर मी तुरुंगात गेलो, असं सांगतानाच आमच्या मूळ शिवसेनेसाठी दहावेळा तुरुंगात पाठवलं तरी मी तुरुंगात जायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कधी तरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. ती तयारी नसेल तर पक्षाने 40 वर्षात जे दिलं. त्याच्याशी कृतघ्नता ठरेल. बाळासाहेबांपासून आदित्यपर्यंतचं नातं टिकलं पाहिजे. आम्ही कितीही सर्वोच्च स्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

मी पक्षाला आई मानतो. कुठून काही तरी मिळतंय म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. माझ्या सुटकेनंतर लोकांना आनंद झाला. ते शिवसैनिक होते. ते सर्व अचानक बाहेर पडले. जेलच्या गेटमधून बाहेर पडताना मला अडिच तास लागले. एवढी गर्दी होती, असं सांगतानाच राज्यात शिवसेना एकच आहे. गटबिट काहीच नाही. आमच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हेच आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

यावेळी राऊत यांनी स्वत:ला युद्धकैदी संबोधलं. तसेच पुस्तक लिहून तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तुरुंगातील एक एक तास 100 दिवसांसारखा असतो. तुरुंगात राहणं फार कठिण आहे. मी स्वत:ला वॉर प्रिझनर मानतो. युद्धकैदी, असं ते म्हणाले.

माझं पुस्तक तयार आहे. दोन पुस्तक मी तुरुंगात लिहिली आहेत. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी लिहिणारा माणूस आहे. मी तुरुंगात वाचत होतो. जे वाचलं मग पेपरच्या बातम्या. पुस्तकातील गोष्टी असो, जे आवडलं ते टिपलं. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. इतिहास आणि राजकीय घडामोडींचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.