सांगली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगलीत आटपाडी इथे आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात भाषण करत असताना. पुन्हा एकदा त्यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला आहे. रामदास आठवले यांनी यावेळी भाषण करताना पुन्हा एकदा विरोधकांवर त्याच्या खास शैलीतून निशाना साधला आहे.
मी आलो आहे आटपाडीच्या घरात.कारण जिल्हा अध्यक्ष आहे राजेंद्र खरात.आता विट्याला जाणार आहे वरात म्हणूनच आर पी आय भरात.माझ्या भीमाच योगदान आहे माझ्या लाल बत्तीच्या गाडीला.जर विनाकारण कोणी हात लावला माझ्या गाडीला.तर, आग लावून टाकेन त्याच्या माडीला.आम्ही करत आहोत निर्धार मग कशी होईल आपली हार.