AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट?

"नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते," असे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ आणि राज्याचे माजी अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी व्यक्त (citizenship act Presidential rule may apply)   केले.

...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट?
| Updated on: Dec 16, 2019 | 8:41 AM
Share

मुंबई :  नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आलं  (citizenship act Presidential rule may apply)  आहे. दिल्ली, आसाम, केरळ यांसह ठिकठिकाणी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन झाली. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं. दरम्यान “नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते,” असे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ आणि राज्याचे माजी अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी व्यक्त (citizenship act Presidential rule may apply)   केले.

“नागरिकत्व कायद्यातील नवीन सुधारणा ही लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केली आहे. भारताच्या केंद्र सरकारने हा कायदा केला आहे. हा कायदा वैध आहे की अवैध याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होईल. त्यामुळे त्या ठिकाणी हा निर्णय होईल.” अशी माहिती श्रीहरी अणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

“केंद्र सरकाराने कायदा लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी विविध राज्यात व्हावी लागते. त्यासाठी आतापर्यंत विविध राज्यांना कायदा लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत अनेक राज्य हा कायदा लागू करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत केंद्र सरकार अधिसूचना काढू शकते.” असेही (citizenship act Presidential rule may apply)   ते म्हणाले.

“पण अधिसूचना काढूनही जर राज्यसरकार कायद्याची अंमलबजावणी करत नसतील तर मग राज्यात कायदा लागू करावी लागते. मात्र जर राज्यपालांनी स्पष्ट केले की, एखाद्या राज्यात घटनात्मक राज्य करणे शक्य नाही, केंद्राचे कायदे राज्य सरकार अंमलबजावणी करण्यास तयार नाहीत. तर मग राज्यपालांना राष्ट्रपतींच्या मतानुसार त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.” असेही श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेनं अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही. “शिवसेनेने काही मुद्दे उपस्थित केले होते. काही मुद्द्यांवर स्पष्टता नव्हती, त्यामुळे राज्यसभेत सभात्याग केला. राज्यात काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील. राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार (citizenship act Presidential rule may apply)   आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली या सरकारचा कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री महोदय तीनही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करुन, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील”. असे मत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले होते. यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार असल्याचे बोललं जात आहे.

संबंधित बातम्या : 

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ

राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका काय? एकनाथ शिंदे म्हणतात..

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...